शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

नेहरू देऊ शकले नव्हते ठोस पुरावे

By admin | Updated: January 24, 2016 02:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सार्वजनिक केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्समध्ये दडलेले रहस्य हळूहळू उलगडू लागले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सार्वजनिक केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्समध्ये दडलेले रहस्य हळूहळू उलगडू लागले आहे. यामधील एका दस्तावेजानुसार १९६२ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेताजींच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनाची सूचना दिली होती. परंतु त्याला दुजोरा देणारे ठोस पुरावे ते देऊ शकले नव्हते. त्यानंतर नेताजींचे बंधू सुरेशचंद्र बोस यांनी पंडित नेहरूंना एक पत्र लिहून नेताजींच्या मृत्यूशी संबंधित पुरावे देण्याची विनंती केली होती. यावर नेहरूंनी १३ मे १९६२ ला सुरेशचंद्र बोस यांना पाठविलेल्या पत्रात परिस्थितीजन्य पुराव्यांवरून नेताजींच्या मृत्यूची पुष्टी होत असली तरी यासंदर्भात कुठलाही ठोस पुरावा आपल्याला देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.नेहरूंनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर असा, ‘मला १२ मे रोजीचे आपले पत्र मिळाले. आपण मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचा पुरावा पाठविण्यास म्हटले आहे. पण मी आपणाला यासंदर्भात ठोस पुरावा देऊ शकत नाही. परिस्थितीजन्य पुरावे मात्र देऊ शकतो व चौकशी समितीच्या अहवालात ज्यांचा उल्लेख आहे त्यावरून नेताजींचे निधन झाले असावे असे वाटते. संपूर्ण भारत नेताजींचे स्वागत आणि त्यांना प्रेमाने जवळ घेण्यास आतुर असताना ते गुप्तपणे जीवन जगत असण्याची शक्यता धुसर आहे. दस्तावेजांमधील आणखी काही माहितीनेताजींची कन्या अनिता १९६० मध्ये भारतात आली होती व पंतप्रधान नेहरू यांच्यासोबत त्यांच्या सरकारी निवासस्थानात राहिली होती.नेताजींच्या कुटुंबास काँग्रेस पक्ष दरमहा सहा हजार रुपये ‘स्टायपेंड’ देत होता. मात्र १९६५ मध्ये अनिताने विवाह केल्यानंतर ही रक्कम देणे बंद केले गेले.नेताजींची पत्नी एमिली शेंका ही जर्मनीतील त्यांच्या वास्तव्यात त्यांची स्वीय सचिव होती.एमिली यांनी काँग्रेसकडून रक्कम स्वीकारण्यास नकार दिला होता.ते पत्र नेहरूंनी लिहिलेच नाहीनेताजींच्या खुल्या झालेल्या दस्तावेजांमध्ये सर्वाधिक चर्चा भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्लंडचे त्यांचे समकक्ष क्लिमेंट एटली यांना लिहिले होते. या पत्रात नेताजींबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. परंतु हे पत्र नेहरूंनी लिहिलेच नव्हते, असा काँग्रेसचा दावा आहे. हे पत्र खोटे असल्याचा आरोप करून सत्य उघड झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १८ आॅगस्ट १९४५ रोजी तायवानमधील एका विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. परंतु देशवासीयांनी हे स्वीकारलेले नाही. नेताजींचा राजकारणासाठी वापरनेताजींच्या नावाचा राजकीय लाभ मिळविण्याच्या हेतूने एक पूर्वनियोजित मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी हे समजून घेतले पाहिजे, असा दावा त्यांनी केला. वेगवेगळ्या सरकारच्या कार्यकाळात नेताजींसंदर्भात जे काही खुलासे झाले, माहिती समोर आली त्याची सर्वांनाच कल्पना आहे. परंतु मूलभूत मुद्द्यांवरून देशवासीयांचे लक्ष विचलित करण्याचे चांगले तंत्र या सरकारला अवगत आहे. स्वत:चा कुठलाही इतिहास अथवा वारसा नसलेले लोकच यामागे आहे. या लोकांनी ना कधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला ना बलिदान दिले, याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले. सोबतच राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण त्यांनी करून दिले. पंडित नेहरू हे केवळ भारताचे पहिले पंतप्रधानच नव्हते तर संपूर्ण जगासाठी एक राजनेता होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि इतर सहकाऱ्यांसोबत खऱ्या अर्थाने महानायक होते. हे सत्य कधीही नाकारता येणार नाही,असे प्रतिपादन त्यांनी केले.नेताजींशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. आपल्या ताब्यात अशा आणखी किती फाईल्स आहेत हेही सरकारने सांगावे. सरकारने नेताजींच्या अचानक बेपत्ता होण्यामागच्या रहस्याचाही उलगडा केला पाहिजे.-जी. देवराजन, सचिव, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकमाझ्यावर दबाव होतामी गृहमंत्री असताना नेताजींशी संबंधित फायली खुल्या करू नयेत, यासाठी माझ्यावर दबाव होता.-लालकृष्ण अडवाणी, भाजपनेताजींच्या गोपनीय फाईल्स खुल्या करण्यामागे सरकारचा काहीतरी अंतस्थ हेतू नक्की आहे. स्वातंत्र्य लढ्याशी कवडीचाही संबंध नसलेल्या भाजपाची स्वातंत्र्य लढ्यादरम्यानच्या विविध विचारधारांमध्ये संघर्ष घडविण्याची इच्छा आहे. भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी हे सर्व करीत आहे.

-नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहारनिर्णय योग्यच, पण...सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फायली उघड करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी व्यक्त केले. मात्र स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असलेली मंडळी ही कागदपत्रे खुली करून, स्वातंत्र्य लढ्यातील मोठ्या नेंत्यांविषयी गोंधळ निर्माण करू इच्छित आहेत, असेही त्यांनी बोलून दाखवले.नेताजींच्या गोपनीय फाईल्स खुल्या करणे स्वागतार्ह आहे. या १०० फाईल्स पूर्वीच खुल्या करण्यात आल्या असत्या तर त्यांच्याबाबतच्या अफवा पसरल्याच नसत्या. १९४५ मध्ये नेताजींच्या विमानाला झालेल्या अपघाताचे काही लोक प्रत्यक्षदर्शी होते. जपान सरकारने जगाला नेताजींच्या मृत्यूची बातमी दिली होती.-कृष्णा, नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस यांची विधवा पत्नी.