शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
15
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
16
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
17
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
18
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
19
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
20
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

(निनाद) अवजड वाहनांमुळे पोखरी घाट धोकादायक

By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST

अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी
डिंभे : मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. डिंभे-भीमाशंकर या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्तारुंदी करणाची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातून श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर ते भीमाशंकर हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील मंचर ते डिंभे हे अंतर सपाटीचे असले, तरी डिंभ्यापासून पुढे घाट रस्ता सुरू होतो. येथून पुढील रस्ता अरुंद व अवघड वळणांचा आहे. पोखरी घाटात तर अनेक वळणांवर या रस्त्यावरून जेमतेम एक गाडी जाईल, अशी परिस्थिती आहे. या वळणांवरून समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत. अवघड वळणे व अरुंद रस्ता यामुळे येथील वाहतूक धोकादायक झाली आहे.
पोखरी घाट संपल्यानंतर पुढील रस्ता अतिशय अवघड वळणांचा बनला आहे. पोखरी गावच्या पुढील सेंद्र्याचे लवण हे तर या रस्त्यावरील अपघात प्रवणक्षेत्र बनले आहे. दिवसाआड येथे दुचाकी चारचाकी गाड्यांचे अपघात ठरलेले असतात. मागील आठवड्यात या वळणावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या वळणाबाबत या पूर्वीही अनेकदा वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, अजूनही रस्त्याच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळालेला नाही. या मार्गावर तळेघर, राजपूर, निगडाळे ते भीमाशंकरपर्यंत अनेक अवघड वळणांमुळे आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.
चौकट
भीमाशंकरकडे जाण्यासाठी खेडमार्गेही दुसरा मार्ग आहे. परंतु हा रस्ता अतिशय अवघड व अरुंद आहे. मंदोशी घाटातील वळणे व उतार हा वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शिवाय हा रस्ता पुढे तळेघरला मिळत असल्याने बहुतांश प्रवासी मंचर-भीमाशंकर याच मार्गाचा उपयोग करतात. पोखरी घाट वगळता आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा हा मार्ग एका अर्थाने सुखकरच आहे. या मार्गावरील अवघड वळणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी या भागातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सोबत-फोटो,१ फेब्रुवारी २०१५ डिंभे,पी१
ओळी- पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे मंचर-भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होत आहे. या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
छायाचित्र-कांताराम भवारी.