शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

(निनाद) अवजड वाहनांमुळे पोखरी घाट धोकादायक

By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST

अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

अपघात वाढले : रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी
डिंभे : मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. डिंभे-भीमाशंकर या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्तारुंदी करणाची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातून श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर ते भीमाशंकर हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील मंचर ते डिंभे हे अंतर सपाटीचे असले, तरी डिंभ्यापासून पुढे घाट रस्ता सुरू होतो. येथून पुढील रस्ता अरुंद व अवघड वळणांचा आहे. पोखरी घाटात तर अनेक वळणांवर या रस्त्यावरून जेमतेम एक गाडी जाईल, अशी परिस्थिती आहे. या वळणांवरून समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत. अवघड वळणे व अरुंद रस्ता यामुळे येथील वाहतूक धोकादायक झाली आहे.
पोखरी घाट संपल्यानंतर पुढील रस्ता अतिशय अवघड वळणांचा बनला आहे. पोखरी गावच्या पुढील सेंद्र्याचे लवण हे तर या रस्त्यावरील अपघात प्रवणक्षेत्र बनले आहे. दिवसाआड येथे दुचाकी चारचाकी गाड्यांचे अपघात ठरलेले असतात. मागील आठवड्यात या वळणावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या वळणाबाबत या पूर्वीही अनेकदा वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, अजूनही रस्त्याच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळालेला नाही. या मार्गावर तळेघर, राजपूर, निगडाळे ते भीमाशंकरपर्यंत अनेक अवघड वळणांमुळे आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.
चौकट
भीमाशंकरकडे जाण्यासाठी खेडमार्गेही दुसरा मार्ग आहे. परंतु हा रस्ता अतिशय अवघड व अरुंद आहे. मंदोशी घाटातील वळणे व उतार हा वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शिवाय हा रस्ता पुढे तळेघरला मिळत असल्याने बहुतांश प्रवासी मंचर-भीमाशंकर याच मार्गाचा उपयोग करतात. पोखरी घाट वगळता आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणारा हा मार्ग एका अर्थाने सुखकरच आहे. या मार्गावरील अवघड वळणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी या भागातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सोबत-फोटो,१ फेब्रुवारी २०१५ डिंभे,पी१
ओळी- पोखरी घाटातील अवघड वळणांमुळे मंचर-भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होत आहे. या रस्त्यावरील अवघड वळणे काढून रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
छायाचित्र-कांताराम भवारी.