शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

सामान्य पातळीहून कमी बरसला मान्सून, तूट ५ टक्के

By admin | Updated: September 14, 2016 05:37 IST

या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला

नवी दिल्ली : या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पाऊस कमी झाला असला तरी जलाशये आणि पिकांची स्थिती उत्तम आहे. जुलै आणि आॅगस्टमधील दमदार पावसामुळे एकूण पीक परिस्थिती उत्तम असली तरी देशाच्या काही भागांतील पिकांबाबत मात्र चिंता वाटते, असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये पूर्व व ईशान्य भाग वगळता सामान्य पातळीहून १९ टक्के कमी पाऊस झाला. पूर्व व ईशान्य भागात ६६ टक्के अतिरिक्त सरी कोसळल्या. उर्वरित सर्व राज्यांत या महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे तेथे पावसाची ४० ते ५० टक्के तूट आहे. ही तूट या आठवड्यातील पावसाने भरून येईल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. मान्सूनचे अचूक भाकीत वर्तविण्यात ही संस्था सर्वात पुढे आहे. ‘सध्या पावसाचे प्रमाण सामान्य पातळीहून खाली आहे. तथापि, याचा अर्थ पाऊस अपुरा झाला असा नाही. पावसाची तूट येत्या काळात काही प्रमाणात भरून निघेल’, असे या विभागाचे संचालक डी. एस. पै यांनी सांगितले. नैऋत्य मान्सूनचा हंगाम ३० सप्टेंबरला संपत असून, त्यानंतर कोणत्या घटकांंचा पावसावर परिणाम झाला हे तपासले जाणार आहे. १० आॅक्टोबर रोजी आम्ही मान्सून हंगामाबाबतचा अहवाल सादर करू. हंगाम संपण्यासाठी थोडा अवधी उरला असल्यामुळे आम्ही आता आमच्या भाकितात बदल करणार नाही, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएमडीने मान्सून सुरू होताना जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या १०६ टक्के पर्जन्यवृष्टी होईल, असे भाकीत केले होते. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ने एप्रिलमध्ये सरासरीच्या १०५ टक्के, तर आणखी एक खासगी संस्था व्हेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिेसस लि.ने ईशान्येकडील भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात पाऊस सरासरीच्या १०४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला होता.