शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सामान्य पातळीहून कमी बरसला मान्सून, तूट ५ टक्के

By admin | Updated: September 14, 2016 05:37 IST

या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला

नवी दिल्ली : या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पाऊस कमी झाला असला तरी जलाशये आणि पिकांची स्थिती उत्तम आहे. जुलै आणि आॅगस्टमधील दमदार पावसामुळे एकूण पीक परिस्थिती उत्तम असली तरी देशाच्या काही भागांतील पिकांबाबत मात्र चिंता वाटते, असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये पूर्व व ईशान्य भाग वगळता सामान्य पातळीहून १९ टक्के कमी पाऊस झाला. पूर्व व ईशान्य भागात ६६ टक्के अतिरिक्त सरी कोसळल्या. उर्वरित सर्व राज्यांत या महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे तेथे पावसाची ४० ते ५० टक्के तूट आहे. ही तूट या आठवड्यातील पावसाने भरून येईल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. मान्सूनचे अचूक भाकीत वर्तविण्यात ही संस्था सर्वात पुढे आहे. ‘सध्या पावसाचे प्रमाण सामान्य पातळीहून खाली आहे. तथापि, याचा अर्थ पाऊस अपुरा झाला असा नाही. पावसाची तूट येत्या काळात काही प्रमाणात भरून निघेल’, असे या विभागाचे संचालक डी. एस. पै यांनी सांगितले. नैऋत्य मान्सूनचा हंगाम ३० सप्टेंबरला संपत असून, त्यानंतर कोणत्या घटकांंचा पावसावर परिणाम झाला हे तपासले जाणार आहे. १० आॅक्टोबर रोजी आम्ही मान्सून हंगामाबाबतचा अहवाल सादर करू. हंगाम संपण्यासाठी थोडा अवधी उरला असल्यामुळे आम्ही आता आमच्या भाकितात बदल करणार नाही, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएमडीने मान्सून सुरू होताना जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या १०६ टक्के पर्जन्यवृष्टी होईल, असे भाकीत केले होते. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ने एप्रिलमध्ये सरासरीच्या १०५ टक्के, तर आणखी एक खासगी संस्था व्हेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिेसस लि.ने ईशान्येकडील भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात पाऊस सरासरीच्या १०४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला होता.