शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

भविष्यात काँग्रेसचा ‘हात’ धरायला अनेक पक्ष उत्सुक

By admin | Updated: December 30, 2015 02:25 IST

बिहारचा अपवाद वगळता गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून जागोजागी सातत्याने पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाचे ग्रह अचानक बदलले आहेत. देशातले विविध पक्ष

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीबिहारचा अपवाद वगळता गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून जागोजागी सातत्याने पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाचे ग्रह अचानक बदलले आहेत. देशातले विविध पक्ष काँग्रेसशी जवळीक साधण्यासाठी उत्सुक आहेत. यात तृणमूल आणि डावी आघाडी असे पश्चिम बंगालमध्ये पस्परांच्या विरोधातले पक्ष आहेत तर तामिळनाडूत सध्या सत्तेबाहेर असलेला द्रमुक, काँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करण्यास उत्सुक आहे. दोन्ही राज्यात २0१६ च्या एप्रिल मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तथापि काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुक ज्या पक्षांना निवडणूकपूर्व युतीचे निमंत्रण देईल, त्यात प्रामुख्याने काँग्रेसचा समावेश असेल, असे स्पष्ट संकेत या पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी अलीकडेच दिले होते. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पर्यंत द्रमुक युपीएचा घटक पक्ष व काँग्रेसचा विश्वासू सहकारी होता. युपीए १ व युपीए २ मधे द्रमुक केंद्रीय सत्तेत युपीएचा घटक पक्ष होता. तथापि ए. राजा, दयानिधी मारन व कनिमोळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर लोकसभेची निवडणूक उभय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. परिणामी राज्यात दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागांपैकी ३७ जागा जयललितांच्या अण्णाद्रमुकने तर २ जागा एनडीएने जिंकल्या. तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ई.एलॅन्गोवन यांनी मध्यंतरी राज्यात काँग्रेस स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवेल असे सूचक विधान केले होते. तथापि करूणानिधींच्या आवाहनानंतर काँग्रेस आपली भूमिका बदलेल काय? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस सध्या सत्तेवर आहे. २0१६ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी पुनश्च एकदा काँग्रेसशी हातमिळवणी करू इच्छितात. याचे मुख्य कारण राज्यात काँग्रेसला हमखास मिळणारी ८ ते १0 टक्के मते विरोधकांकडे जाऊ नयेत, यासाठी ममता दीदींचे प्रयत्न सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत संसदेच्या मान्सून अधिवेशनापासूनच जाणवत होते. हिवाळी अधिवेशनात तर नॅशनल हेरल्ड प्रकरणापासून प्रत्येक मुद्यावर तृणमूलने काँग्रेसला मनापासून साथ दिली. काँग्रेस हायकमांडलाही पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेसबरोबर निवडणूक समझोता करण्याची इच्छा आहे, अशी राजधानीत चर्चा आहे. तथापि पश्चिम बंगालमधे काँग्रेसचे स्थानिक नेते अधिर रंजन चौधरी, दिपा दासमुन्शी वगैरे या समझोत्याच्या कडवट विरोधात आहेत. राज्यातले डावे पक्ष काँग्रेसच्या हालचालींचा अंदाज घेत आहेत. केंद्रात युपीए १ ला डाव्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा होता. अणुकराराच्या मुद्यावर डाव्यांनी युपीएचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर प.बंगालमधे सलग ३४ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षांचा २0११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने दारूण पराभव केला. गतवर्षी लोकसभेच्या निवडणुकीत या पराभवाची पुनरावृत्ती झाली. तेव्हापासून राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी करण्याबाबत डावे उत्सुक आहेत. या संदर्भात मार्क्सवादी पक्षाचे महासचिव सिताराम येचुरी म्हणतात, प.बंगालमधे काँग्रेसबरोबर समझोता करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे मात्र या विषयावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जानेवारी महिन्यात पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सखोल चर्चा होईल. प.बंगालमधील मार्क्सवादी पक्षाच्या राज्य शाखेनेही केंद्रीय समितीच्या निर्णयानंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्याचे ठरवले आहे.