शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करा - बबनराव शिंदे : माढा तालुका टंचाई आढावा बैठक

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत करण्यात आला.

कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत करण्यात आला.
माढा तालुका टंचाई आढावा बैठक कुडरूवाडी शहरातील संकेत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि.प.चे कृषी सभापती प्रा.पंडित वाघ, शिवाजी कांबळे, माजी जि.प.अध्यक्षा निशिगंधा माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सभापती शीलाताई रजपूत, उपसभापती तुकाराम ढवळे, रणजिसिंह शिंदे, जि.प.सदस्य प्रा.सज्रेराव बागल, झुंजार भांगे, ता.पं.सदस्य आप्पासाहेब वाघमोडे, सुंदर माळी, उमादेवी कदम, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक वामनभाऊ उबाळे, मारुतीराव बागल, आण्णासाहेब ढाणे, शशिकांत माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेविषयी बोलताना अधिकार्‍यांनी चुकीची माहिती देत, गावांना पाणी पोहोचत नसूनही पाणी पोहोचत असल्याची माहिती दिली. व्होळे व 27 गावे पाणीपुरवठा योजनेत 11 गावांना पाणी पोहोचते असे सांगितले, तर कव्हे व 11 गावे पाणीपुरवठा योजनेतील पाईप, ट्रान्स्फॉर्मर आदी साहित्य चोरीला गेले असल्याची माहितीही उघड झाली. माढा व 2 गावे पाणीपुरवठा योजनाही दुरुस्त करावी, असे सूचविले.
ज्या गावात पाणी आलेच नाही त्या गावात त्वरित टँकर सुरु करावेत व पाण्याचा प्रo्न सोडवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. व्होळे योजनेतील गावांनी प्रत्येकी 75 हजार रुपये भरुनही त्यांना पाणी नाही याबाबत नाराजी व्यक्त केली. सीनेकाठी शेततळ्यांची मागणी असून, कृषी विभागाने पुढाकार घेऊन एमआरईजीएसमधून शेततळी द्यावीत जेणेकरुन मजुरांच्या हाताला काम मिळेल.
सध्या जनावरांच्या चार्‍याचा प्रo्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रशासनाने तो त्वरित सोडवावा, चारा डेपो आवश्यक तेथे सुरु करावेत, 50 टक्के सबसिडीवर चारा डेपो काढावेत, छावण्यांसाठी संस्थांमार्फत अर्ज करावेत असेही सूचविले. मागील काळात विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 56 हजार जनावरे सांभाळली होती, यंदा मात्र कारखाना कुठलीही छावणी सुरु करणार नसल्याचेही आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तलाठय़ांना सूचना
तलाठय़ांनी पीकपाण्याचे पंचनामे करुन उतार्‍यांवर तशा नोंदी कराव्यात, ऊस जळालेला असला तर तसे लिहावे, अशा सूचनाही तलाठय़ांना देण्यात आल्या.
शंभर टक्के विहीर पुनर्भरण करा
विहीर पुनर्भरणाची कामे सर्वत्र घ्या, यामुळे शेतकर्‍यांना रोजगार मिळेल जर अधिकार्‍यांनी मनावर घेतले तर हे काम अवघड नाही. यामुळे हाताला काम मिळून पाण्याचे सिंचनही वाढेल. एमआरईजीएसमधून विहिरींना परवानगी देण्यात यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रय} सुरु असल्याचेही आ.शिंदे यांनी यावेळी सांगिंतले.

अधिकार्‍यांची भंबेरी
नक्की चारा किती व यातील ओला चारा व सुका चारा किती हा प्रo्न जि.प.च्या माजी अध्यक्षा निशिगंधा माळी यांनी विचारताच अधिकार्‍यांची बोबडी वळाली़ अधिकार्‍यांनी कारखान्याच्या नोंदीवरुनच आकडेवारी सांगत असल्याचे आण्णासाहेब ढाणे यांनी आरोप केला. यापैकी किती ऊस पाण्यावाचून जळाला हे सांगा अशी विचारणा अधिकार्‍यांना केली.


विहीर, बोअर अधिग्रहण करताना त्यातील पाणी किती वेळ चालते हे आधी पाहा, असे माजी सभापती रणजितसिंह शिंदे म्हणाल़े केवळ 10 मिनिटे बोअर चालत असेल तर तसे नमूद करा. 15 दिवस बोअर चालत असेल असे सांगितले व ते बोअर केवळ 8 दिवसच चालले तर पंचायत होईल असेही रणजितसिंह शिंदे म्हणाल़े