शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करा - बबनराव शिंदे : माढा तालुका टंचाई आढावा बैठक

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत करण्यात आला.

कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत करण्यात आला.
माढा तालुका टंचाई आढावा बैठक कुडरूवाडी शहरातील संकेत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि.प.चे कृषी सभापती प्रा.पंडित वाघ, शिवाजी कांबळे, माजी जि.प.अध्यक्षा निशिगंधा माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सभापती शीलाताई रजपूत, उपसभापती तुकाराम ढवळे, रणजिसिंह शिंदे, जि.प.सदस्य प्रा.सज्रेराव बागल, झुंजार भांगे, ता.पं.सदस्य आप्पासाहेब वाघमोडे, सुंदर माळी, उमादेवी कदम, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक वामनभाऊ उबाळे, मारुतीराव बागल, आण्णासाहेब ढाणे, शशिकांत माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेविषयी बोलताना अधिकार्‍यांनी चुकीची माहिती देत, गावांना पाणी पोहोचत नसूनही पाणी पोहोचत असल्याची माहिती दिली. व्होळे व 27 गावे पाणीपुरवठा योजनेत 11 गावांना पाणी पोहोचते असे सांगितले, तर कव्हे व 11 गावे पाणीपुरवठा योजनेतील पाईप, ट्रान्स्फॉर्मर आदी साहित्य चोरीला गेले असल्याची माहितीही उघड झाली. माढा व 2 गावे पाणीपुरवठा योजनाही दुरुस्त करावी, असे सूचविले.
ज्या गावात पाणी आलेच नाही त्या गावात त्वरित टँकर सुरु करावेत व पाण्याचा प्रo्न सोडवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. व्होळे योजनेतील गावांनी प्रत्येकी 75 हजार रुपये भरुनही त्यांना पाणी नाही याबाबत नाराजी व्यक्त केली. सीनेकाठी शेततळ्यांची मागणी असून, कृषी विभागाने पुढाकार घेऊन एमआरईजीएसमधून शेततळी द्यावीत जेणेकरुन मजुरांच्या हाताला काम मिळेल.
सध्या जनावरांच्या चार्‍याचा प्रo्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रशासनाने तो त्वरित सोडवावा, चारा डेपो आवश्यक तेथे सुरु करावेत, 50 टक्के सबसिडीवर चारा डेपो काढावेत, छावण्यांसाठी संस्थांमार्फत अर्ज करावेत असेही सूचविले. मागील काळात विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 56 हजार जनावरे सांभाळली होती, यंदा मात्र कारखाना कुठलीही छावणी सुरु करणार नसल्याचेही आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तलाठय़ांना सूचना
तलाठय़ांनी पीकपाण्याचे पंचनामे करुन उतार्‍यांवर तशा नोंदी कराव्यात, ऊस जळालेला असला तर तसे लिहावे, अशा सूचनाही तलाठय़ांना देण्यात आल्या.
शंभर टक्के विहीर पुनर्भरण करा
विहीर पुनर्भरणाची कामे सर्वत्र घ्या, यामुळे शेतकर्‍यांना रोजगार मिळेल जर अधिकार्‍यांनी मनावर घेतले तर हे काम अवघड नाही. यामुळे हाताला काम मिळून पाण्याचे सिंचनही वाढेल. एमआरईजीएसमधून विहिरींना परवानगी देण्यात यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रय} सुरु असल्याचेही आ.शिंदे यांनी यावेळी सांगिंतले.

अधिकार्‍यांची भंबेरी
नक्की चारा किती व यातील ओला चारा व सुका चारा किती हा प्रo्न जि.प.च्या माजी अध्यक्षा निशिगंधा माळी यांनी विचारताच अधिकार्‍यांची बोबडी वळाली़ अधिकार्‍यांनी कारखान्याच्या नोंदीवरुनच आकडेवारी सांगत असल्याचे आण्णासाहेब ढाणे यांनी आरोप केला. यापैकी किती ऊस पाण्यावाचून जळाला हे सांगा अशी विचारणा अधिकार्‍यांना केली.


विहीर, बोअर अधिग्रहण करताना त्यातील पाणी किती वेळ चालते हे आधी पाहा, असे माजी सभापती रणजितसिंह शिंदे म्हणाल़े केवळ 10 मिनिटे बोअर चालत असेल तर तसे नमूद करा. 15 दिवस बोअर चालत असेल असे सांगितले व ते बोअर केवळ 8 दिवसच चालले तर पंचायत होईल असेही रणजितसिंह शिंदे म्हणाल़े