शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

स्थानिकांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

मध्यरात्री केली पोलिसांची कानउघाडणी

मध्यरात्री केली पोलिसांची कानउघाडणी
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा पहिल्या शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासनाने त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक दुकानदार, पौरोहित्य संघ आणि नागरिकांना पिटाळून लावत निर्मनुष्य रस्ते करण्याच्या भूमिकेमुळे संतापलेल्या त्र्यंबकेश्वरवासीयांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना त्र्यंबकेश्वरला बोलावून खडे बोल सुनावले.
त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लगोलग पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला फटकारत स्थानिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे जाहीरपणे सांगावे लागले. त्याचीच परिणती म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन हे पहिल्या व दुसर्‍या आखाड्याच्या शाहीस्नानापर्यंत त्र्यंबकेश्वरमध्येच थांबून होते.
पहिल्या शाहीस्नानाच्या रात्री साधारणत: अकरा वाजेपासूनच पोलिसांनी आखाड्यांच्या शाही मार्ग मिरवणुकीत थांबलेल्या स्थानिक व परराज्यीय भाविकांना शहराबाहेर पिटाळून लावण्यासाठी बळाचा वापर केल्याचे समजते. तसेच शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद करण्याबरोबरच मिरवणूक मार्गातील कुटुंबीयांना घरे बंद करण्याचे फर्मान सोडल्याचे समजते. याचा परिपाक म्हणून संतापलेले त्र्यंबकेश्वरमधील दुकानदार व व्यावसायिक यांच्यासह पौरोहित्य संघाचे पदाधिकारी यांनी रात्री साडेबारा वाजता एकत्र येत पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या या दडपशाहीबाबत नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिकला निरोप पाठवून तातडीने बोलावून घेतले. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला तातडीने पालकमंत्री गिरीश महाजन पोहोचले. नाराज त्र्यंबकवासीयांची समजूत घालून त्यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाची कानउघाडणी केल्याचे कळते. तसेच तत्काळ ध्वनिक्षेपकावरून त्र्यंबकेश्वरवासीयांना कोणताही त्रास दिला जाणार नााही, असेही जाहीर केले. त्यानंतर काहीसे वातावरण निवळले.(विशेष प्रतिनिधी)