शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नाइलाज आहे, पाणी सोडावेच लागणार!

By admin | Updated: September 14, 2016 05:28 IST

सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतील १५ ऐवजी १२ हजार क्युसेक्स पाणी तमिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत सोडण्याच्या सोमवारी दिलेल्या सुधारित आदेशाचे पालन करण्याचा निर्णय कर्नाटक

बंगळुरू : सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतील १५ ऐवजी १२ हजार क्युसेक्स पाणी तमिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत सोडण्याच्या सोमवारी दिलेल्या सुधारित आदेशाचे पालन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतला. पाणी सोडताना जे कोणी हिंसाचार करतील त्यांचा कठोरपणे बीमोड केला जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले. या निर्णयाची अंमलबजावणी करणे खूपच कठीण असले तरी न्यायालयाच्या आदेशामुळे ती करणे बंधनकारक आहे, असे सांगतानाच, त्यांनी राज्यातील जनतेला शांततेचे आवाहन केले.कर्नाटकात आज सर्वत्र शांतता होती. तरीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या मदतीला शीघ्र कृती दलाचे ७00 जवान पाठवण्यात आले. तसेच निम सुरक्षा दलाचे जवानही बंगळुरू आणि अन्य शहरांत तैनात आहेत.दरम्यान, पोलिसांचा लाठीमार चुकवताना जखमी झालेल्या आणखी एकाचा (३०) मृत्यू झाला. मंगळवारी बंगळुरू शहरात निदर्शनांचे तुरळक प्रकार घडले. पोलिसांचा लाठीमार चुकविण्यासाठी या व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून घाबरून उडी मारली होती. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या आंदोलनात मरण पावलेल्यांची संख्या दोन झाली आहे.कावेरीच्या प्रश्नावरून दोन राज्यांत घडणाऱ्या घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असते. हिंसाचार कोणत्याही प्रश्नावर उत्तर नसते, असे सांगून मोदी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कालच्या घटनेचे पडसाद उमटू नयेत म्हणून आंतरराष्ट्रीय टेक पार्क बंद ठेवण्यात आला होता. सर्व कंपन्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली होती. मात्र, कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून निर्माण झालेल्या परिस्थितीत पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करून तमिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, असे आवाहन विरोधी पक्ष द्रमुकने केले आहे. कर्नाटकातील तामिळींवर व त्यांच्या मालमत्तेवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करून पंतप्रधानांची भेट घ्यावी, अशी मागणी तामिळनाडू काँग्रेसने केली आहे. नुकसान झालेल्या तामिळींना भरपाई द्यावी, अशीही काँग्रेसची मागणी आहे.