शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

े फेरपंचनाम्यांमुळे नुकसानीचा अंदाज कठीण

By admin | Updated: May 8, 2014 19:45 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विशिष्ट भागातच हजेरी लावणार्‍या अवकाळी पावसामुळे होणार्‍या नुकसानीचा अंदाज बांधणेही यंत्रणेला कठीण झाले असून, एका ठिकाणचा पंचनामा पूर्ण होत नाही तोच दुसर्‍या दिवशी पुन्हा पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने त्याचा परिणाम भरपाई देण्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विशिष्ट भागातच हजेरी लावणार्‍या अवकाळी पावसामुळे होणार्‍या नुकसानीचा अंदाज बांधणेही यंत्रणेला कठीण झाले असून, एका ठिकाणचा पंचनामा पूर्ण होत नाही तोच दुसर्‍या दिवशी पुन्हा पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने त्याचा परिणाम भरपाई देण्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्‘ातील ग्रामीण भागात मार्च व एप्रिल महिन्यांत सातत्याने अवकाळी पावसाने हजेरी कायम ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. महसूल व कृषी खात्याने नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला व त्यावर शासनाने नुकसानभरपाईची रक्कमही पाठविली. परंतु त्यानंतरही पावसाचे थैमान कायम राहिले आहे. विशेष करून बागलाण तालुक्यातील विशिष्ट भागात तर दररोजच पाऊस हजेरी लावत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश असल्याने यंत्रणेची पाठ फिरत नाही तोच पुन्हा पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.
बुधवारी सायंकाळी जिल्‘ात सर्वदूर झालेल्या पावसामुळेही त्यात आता भर पडली आहे. सर्वाधिक पाऊस चांदवड तालुक्यात नोंदविला गेला असून, दोन ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे. चांदवडला १२, सिन्नर व इगतपुरी येथे प्रत्येकी ४, निफाडला २ व नाशिकला १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे.