शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फाशीची शिक्षा कायम ठेवावी की कायमची काढून टाकावी?

By admin | Updated: August 25, 2015 03:51 IST

भारतातील फौजदारी कायद्यांमध्ये गेल्या १५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली फाशीची शिक्षा यापुढेही सुरू ठेवावी की ती कायद्याच्या पुस्तकांमधून कायमची काढून टाकावी

नवी दिल्ली : भारतातील फौजदारी कायद्यांमध्ये गेल्या १५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली फाशीची शिक्षा यापुढेही सुरू ठेवावी की ती कायद्याच्या पुस्तकांमधून कायमची काढून टाकावी याविषयीचा अहवाल केंद्रीय विधि आयोग येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयास सादर करणार आहे.या विषयावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा व्हावी व सल्लामसलत करण्यास आधारभूत माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विधि आयोगाने गेल्या वर्षी २२ मे रोजी एक ‘कन्सल्टेशन पेपर’ जारी केला होता. त्यानुसार चर्चा व सल्लामसलत पूर्ण झाल्यानंतर आता आयोग अहवाल सादर करणार आहे. सध्याच्या आयोगाची तीन वर्षांची मुदत ३१ आॅगस्टला संपत असल्याने आयोगाची अहवालास अंतिम स्वरूप देण्याची लगबग सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयास येत्या आठवड्यांत ‘कधीतरी’ फाशीच्या शिक्षेविषयीचा अहवाल सादर केला जाईल, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले. फाशीची शिक्षा रद्द करायची झाल्यास त्यासाठी कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी लागणार असल्याने आयोगाचा अहवाल केंद्रीय विधि मंत्रालयासही दिला जाईल.मुंबईतील मार्च १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोटांबद्दल याकूब मेमनला २२ वर्षांनंतर फासावर लटकविण्यात आल्यावरून अलीकडेच बरीच मत-मतांतरे व्यक्त झाली होती. त्यानिमित्ताने फाशीसारखी क्रूर शिक्षा भारतासारख्या पुरोगामी देशाने सुरू ठेवावी का हा विषयही पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यादृष्टीने आयोगाचा हा अहवाल प्रासंगिक व औत्सुक्याचा ठरणार आहे. संतोषभूषण बरियार वि. महाराष्ट्र सरकार आणि शंकर किसनराव खाडे वि. महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्रातून गेलेल्या दोन खटल्यांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या विषयाचा सखोल अभ्यास करून अहवाल देण्यास सांगितले होते. या निमित्ताने फाशीच्या विषयावर अद्ययावत माहितीच्या आधारे देशात अभ्यासपूर्ण विचारमंथन होईल. तसेच आयोगाच्या अहवालाच्या रूपाने या वादग्रस्त विषयावर न्यायालये व कायदेमंडळांत उपस्थित होणारे मुद्दे व व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतांच्या अनुषंगाने जागतिक पातळीवरील विचारसरणी समोर येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. आयोगाच्या ‘कन्सल्टेशन पेपर’वर देशभरातून अनेक तज्ज्ञांनी व मान्यवरांनी मते नोंदविली. याशिवाय आयोगाने गेल्या महिन्यात या विषयावर दिल्लीत एक दिवसभराचे चर्चासत्रही आयोजित केले होते. ज्यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या बाजूने मत नोंदविले त्यांत दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी व द्रमुकच्या खासदार कनिमोही यांचा समावेश होता. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे दुष्यंत दवे यांच्यासह इतरांनी फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा जोरदार पुरस्कार केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)न्यायालयांनी फक्त ‘विरळात विरळा’ प्रकरणांत फाशी ठोठवावी, असे म्हटले तरी ‘विरळात विरळा’ म्हणजे काय याची नि:संदिग्ध व्याख्या केली जावी, असेही मत अनेकांनी आयोगाकडे नोंदविले आहे. दोन्ही बाजूंनी दमदार मुद्देफाशी कायम ठेवण्याच्या बाजूने : ज्याने समाजस्वास्थ्य व नैतिक पावित्र्य भंग पावते अशा गुन्ह्यांसाठी फाशी हवीच. ज्यासाठी फाशीची तरतूद आहे असे गुन्हे करणाऱ्यांना सुधारण्याची संधी देऊन काहीच फायदा नाही व अशी संधी दिली तरी ते सुधारण्याची शक्यता फारच कमी असते.फाशी रद्द करण्याच्या बाजूने : सरकारकडून केली जाणारी दंडात्मक कारवाई व्यक्तिगत सूडभावनेने नव्हे, तर समाजाच्या नैतिक मूल्यांच्या रक्षणासाठी केली जाते. हा विषय भावनिक नव्हे तर तर्क संगत विचार करण्याचा आहे. कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो. त्यामुळे न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश सुधारणावादी असायला हवा. आपण केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य कळल्यावर गुन्हेगारांना सुधारण्याची संधी द्यायला हवी.