शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

करमणूक विभागाची साडे चार कोटींची वसुली ९ कोटींचे उद्दिष्ट्य : केबल व चित्रपटगृहांचे सर्वाधिक उत्पन्न

By admin | Updated: December 29, 2015 23:52 IST

जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी व चित्रपटगृहांच्या माध्यमातून मिळणारा कर हा सर्वाधिक आहे.

जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी व चित्रपटगृहांच्या माध्यमातून मिळणारा कर हा सर्वाधिक आहे.

जिल्हा प्रशासनाने जमिन, गौण खनिज तसेच करमणूक कराच्या स्वरुपात कराची वसुली केली जात असते. गौण खजिन व महसूल करापाठोपाठ करमणुकीवर आकारल्या जाणार्‍या कराची रक्कम ही मोठी असते. या विभागाने नऊ महिन्यात करमणूक करापोटी चार कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. त्यात केबल जोडणीच्या माध्यमातून एक कोटी ४० लाख ३ हजार ७९६ रुपये, चित्रपटगृहांच्या माध्यमातून एक कोटी ३३ लाख ७८ हजार ५५१ रुपये, डी.टी.एच.च्या माध्यमातून एक कोटी ९४ लाख ५८ हजार ९३६ रुपयांचा कर वसुल करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ व्हीडीओ केंद्रांकडून २८ हजार ९२९ रुपये, मनोरंजन उद्यानांकडून १२ हजार ८९७ रुपये, व्हीडीओ गेमच्या माध्यमातून ७० हजार ५५५ तर अन्य मनोरंजन केंद्रांकडून ७७ हजार ९२६ रुपयांच्या कराची वसुली करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने करमणूक कर विभागाला २०१५/१६ या वर्षभरासाठी ९ कोटी रुपयांच्या कराच्या वसुलीच उद्दिष्ट्य दिले आहे. ९ महिन्यात या विभागाने चार कोटी ४१ लाखांपर्यंत मजल मारली आहे. आता अवघ्या तीन महिन्यात साडे चार कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान कायम राहणार आहे. ३१ डिसेंबर रोजी होणार्‍या विविध मनोरंजन कार्यक्रमाच्या आयोजनामुळे कराच्या रकमेत भर पडणार आहे.

इन्फो-
डिजिटायझेशनच्या सक्तीमुळे वाढणार उत्पन्न
जिल्ह्यातील नागरी वस्तीमधील केबल टी.व्ही.च्या डिजिटायझेशन साठी जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या अंतर्गत प्रत्येक जोडणीधारकाला सेट टॉप बॉक्स बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ११ डिसेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार फेज १ मध्ये डिजिटायझेशन करण्यात आलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित नागरी भागात डिसेंबर २०१५ पर्यंत तसेच ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ पर्यंत केबलचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात येणार आहे.