शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात का?

By admin | Updated: September 14, 2016 05:23 IST

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत.सर्वसामान्य नागरिक, खासदार आणि अमदारांसह लोकप्रतिनिधी, घटनातज्ज्ञ, अभ्यासक, सनदी अधिकारी आणि समाजमाध्यमांवर प्रभाव टाकणाऱ्यांसह सर्वच इच्छुक व्यक्तींनी आपली मते myGov.com या वेबसाइटवर नोदवावी, असे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

देशात लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी मांडली होती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्यास अनुकुलता दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर हा विषय पुढे नेण्यापूर्वी सरकार त्यावरील विचारमंथनात नागरिकांना सहभागी करून घेत आहे.

नागरिकांना हे आवाहन करताना त्यासोबत दिलेल्या एका टिप्पणीत म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या योग्यायोग्यतेवर विविध पातळीवर चर्चा झाली आहे. त्यातून असे मत दिसून आले की, एकाच वेळी निवडणुका घेतल्याने मतदारांचा उत्साह टिकून राहील एवढेच नव्हे तर, त्यामुळे निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल आणि प्रशासकीय कामांची पुनरुक्तीही टळेल.

हे टिप्पण म्हणते की, यामुळे निवडणुकांवर होणारा राजकीय पक्षांचा खर्चही कमी होईल. शिवाय प्रत्येक वेळी स्वतंत्र निवडणूक घेताना आचारसंहिता लागू होण्याने सरकारी कामांचा जो खोळंबा होतो, तोही होणार नाही. एकाच वेळी निवडणुका घ्यायचे ठरविले तर त्यासाठी सुरळित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेतील निवडणुकांसंबंधीच्या ८३, १७२, ८५ व १७४ या अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्याखेरीज इतरही बदल करावे लागतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.