शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात का?

By admin | Updated: September 14, 2016 05:23 IST

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत.सर्वसामान्य नागरिक, खासदार आणि अमदारांसह लोकप्रतिनिधी, घटनातज्ज्ञ, अभ्यासक, सनदी अधिकारी आणि समाजमाध्यमांवर प्रभाव टाकणाऱ्यांसह सर्वच इच्छुक व्यक्तींनी आपली मते myGov.com या वेबसाइटवर नोदवावी, असे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

देशात लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी मांडली होती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्यास अनुकुलता दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर हा विषय पुढे नेण्यापूर्वी सरकार त्यावरील विचारमंथनात नागरिकांना सहभागी करून घेत आहे.

नागरिकांना हे आवाहन करताना त्यासोबत दिलेल्या एका टिप्पणीत म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या योग्यायोग्यतेवर विविध पातळीवर चर्चा झाली आहे. त्यातून असे मत दिसून आले की, एकाच वेळी निवडणुका घेतल्याने मतदारांचा उत्साह टिकून राहील एवढेच नव्हे तर, त्यामुळे निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल आणि प्रशासकीय कामांची पुनरुक्तीही टळेल.

हे टिप्पण म्हणते की, यामुळे निवडणुकांवर होणारा राजकीय पक्षांचा खर्चही कमी होईल. शिवाय प्रत्येक वेळी स्वतंत्र निवडणूक घेताना आचारसंहिता लागू होण्याने सरकारी कामांचा जो खोळंबा होतो, तोही होणार नाही. एकाच वेळी निवडणुका घ्यायचे ठरविले तर त्यासाठी सुरळित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेतील निवडणुकांसंबंधीच्या ८३, १७२, ८५ व १७४ या अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्याखेरीज इतरही बदल करावे लागतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.