शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सेंद्रिय शेतीसाठी लवकरच धोरण एकनाथ खडसे : शेतकर्‍यांसाठी घोषणांचा वर्षाव

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

नाशिक : शेतीतील रासायनिक खतांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून, तो टाळण्यासाठी आता सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती करणार्‍यांना आर्थिक अनुदान देण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

नाशिक : शेतीतील रासायनिक खतांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून, तो टाळण्यासाठी आता सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती करणार्‍यांना आर्थिक अनुदान देण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या डोेंगरे मैदानावर या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी खडसे यांनी शेतीशी संबंधित विविध घोषणा केल्या.सेंद्रिय शेतीच्या धोरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, येत्या अधिवेशनात अशा प्रकारचे धोरण मांडले जाणार असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांना आत्महत्त्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाच्या वतीने विविध आधार देणार्‍या योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यशासनाच्या वतीने लवकरच गोकुळधाम किंवा गोकुळग्राम तसेच नाशिक जिल्‘ात नेटशेड योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
* रासायनिक खतांचा वापर करून शेतकर्‍यांच्या गटाने एकत्रितरीत्या सेंद्रिय शेती केल्यास त्यांच्यासाठी शंभर टक्क्यांपर्यंत अनुदानाची योजना आहे. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खते तयार करणार्‍या तसेच जीवाणू संवर्धन करणार्‍यांना एकात्मिक खतनिर्मिती प्रकल्पाअंतर्गत अनुदान दिले जाईल. या नैसर्गिक शेतीचा प्रसार करणार्‍या सेवाभावी संस्था, शेतकर्‍यांचे गट यांनाही अनुदान देण्यात येईल.
* दुर्बल शेतकर्‍यांसाठी अवजार बॅँक उभी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या गटासाठी ७० ते ८० टक्के अनुदान देण्यात येईल. त्यामाध्यमातून ट्रॅक्टर, ट्रॉली, मळणी, कापणी यंत्रांची खरेदी करता येईल. शेतकर्‍यांनी भाड्याने ही सामग्री वापरावी आणि येणार्‍या भाड्याच्या रकमेतून त्या यंत्रांची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा आहे.
* भाकड, अपंग गायी कसायाकडे जाऊ नये यासाठी गोकुल धाम किंवा गोकुल ग्राम योजना राबविण्यात येईल. त्याअंतर्गत सेवाभावी संस्थांना नाममात्र दरात जमीन आणि कुरणाची व्यवस्था केली जाईल. गायींचे पालन पोषण संबंधितांनी करावे आणि गोमूत्र तसेच शेण किंवा त्यांच्या प्रक्रिया करून त्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्न संबंधित संस्थेने घ्यावे, अशी योजना आहे. केंद्रशासन त्यासाठी २० टक्के अनुदान देण्यास तयार आहे.
(जोड)