शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

दुष्काळी समितीच्या बातमीचा जोड़़़़

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

़़़तर जनावरे कत्तलखान्यात जातील

़़़तर जनावरे कत्तलखान्यात जातील
नगर तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर आणि सारोळा कसार परिसराची केंद्रीय पथकाने पाहणी केली़ या तिन्ही गावांत दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे़ परंतु गेल्या तीन वर्षांपासून पाऊस न झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला़ गेल्या चाळीस वर्षातील हा सर्वात मोठा दुष्काळ आहे़ जनावरांना चारा नाही़ त्यामुळे गायी विकण्याची वेळ आली आहे़ पूर्वी ८० ते ९० हजार रुपयांना विकली जाणारी गाय दुष्काळामुळे २५ ते ३० हजार रुपयांत विकाली लागत असल्याचे यावेळी भोरवाडी येथील शेतकरी नानासाहेब गणपत जाधव यांनी निदर्शनास आणून दिले़ सरकारने चार्‍याची व्यवस्था न केल्यास ही जनावरे कत्तलखान्यात जातील आणि कसायला अच्छे दिन येतील, असे शेतकर्‍यांनी यावेळी सांगितले़
़़़
साहेब काही तरी मदत करा हो़़़़़़
पाथर्डी तालुक्यातील गावांची पाहणी करत असताना मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते़ वाड्या वस्त्यांवरील शेतकरी पथकात सहभागी होवून मागणी करत होते़ बहुतांशी ठिकाणी शेतकर्‍यांनी एकत्रित व्यथा मांडल्या़ सततच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ पिकांवर खर्च होतो, पण पाण्याअभावी तो वसूलही होत नाही, असे किती दिवस चालणार यावर काही तरी ठोस उपाय सरकारने काढावा, असाही एक सूर होता़ तर तीन वर्षांपासून दुष्काळाशी लढतो आहे़ पण पदरात काहीच पडत नसलेल्या हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी हात जोडून साहेब काही तरी मदत करा हो,असे साकडेही त्यांनी घातल़े़
़़़़़
ऑल इज गॉऩ़़
केंद्रीय पथकाला मराठी भाषा समजत नव्हती़ त्यामुळे शेतकर्‍यांचे काय म्हणणे आहे, ते त्यांना समजत नव्हते़ जिल्हाधिकारी अनिल कवडे इंग्रजीतून शेतकर्‍यांची बाजू पथकासमोर मांडत होते़ काही शेतकर्‍यांनी मराठी येत नसलेले अधिकारी हवेतच कशाला? शेतकर्‍यांचे म्हणनेच त्यांना कळत नाही मग यांना दुष्काळ समजणार कसा? असा प्रश्नही युवकांनी उपस्थित केला़ कवडे यांच्याशी चर्चा करताना रथ यांनी या दुष्काळावर ऑल ईज गॉन, अशी प्रतिक्रिया दिली़ पिकांची खुंटलेली वाढ पाहून, अभी कोई उमीद नही है,असे रथ पाहणी दरम्यान म्हणाले़
़़़़