शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

शरद नेरकर, नामपूर

शरद नेरकर, नामपूरनाशिक जिल्‘ातच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. दर महिन्यात पाऊस, दर महिन्याला गारपीट, वादळ या व अशा नैसर्गिक घटनांमुळे शेतकरी भांबावला आहे. निसर्गचक्र बदलल्याने शेती व्यवसायाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेती व्यवसायात आता बदल करावा तरी काय अशा संभ्रमावस्थेत शेतकरी दिसत आहे. शंभरी पूर्ण केलेल्या जुन्याजाणत्या वयस्क शेतकर्‍यांना असे भयानक वर्ष आठवत नाही. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रकच बदललेले दिसत आहे.डाळींब, द्राक्ष, ऊस, कांदा या पिकांसाठी नाशिक जिल्हा विशेष प्रसिद्ध. भगवा, लाल डाळींब ही जिल्‘ाच्या डाळिंबांची खासियत. डोळ्यात पाणी आणेल परंतु चवीला गुळचट असलेल्या नाशिकच्या कांद्याची विशेष प्रसिद्धी, तर चवीला गोड व तोंडात टाकल्यावर पाणी होईल यासाठी देश- विदेशात मागणी असणारी नाशिकची द्राक्षे व श्रम करून मेहनतीने ही पिके घेऊन मोठा झालेला आमचा बळीराजा. मात्र सध्याची निसर्गाची अवस्था बघून मनाने, मानाने व अर्थार्जनाने मोठा झालेला शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. मनाने पुरता खचला आहे.द्राक्ष, कांदा, डाळींब ही पिके तशी बेभरवशाची. निसर्गाच्या अनुकूलतेवर यांचे अस्तित्व ठरते. द्राक्ष, कांदा ही पिके तर खूपच संवेदनशील. ढगाळ हवामानातील बदलामुळेसुद्धा ही पिके खराब होतात. यंदा दर महिन्यात पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानात वाढ होत आहे. पूर्वी केव्हातरी होणारी गारपीट ही नित्याची झाली आहे. ही गारपीट पिकांना मारक ठरते आहे. द्राक्षे काढणीला तयार होती. जिल्‘ातील निफाड, पिंपळगाव, मोसम, आरम या ठिकाणच्या द्राक्षबागांचे भावही ठरलेले होते. सौदेही झालेले होते. मात्र रात्रीतून गारपीट झाली. प्रचंड पाऊस झाला. निंबू, कांद्याच्या आकाराच्या गारा पडल्या. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेथे पक्व झालेले डाळींब या गारपिटीने फुटले, तर फुलावर असलेला फुलांचा गळ झाला. शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. कुणी मुला, मुलींचे लग्न ठरवले होते, कुणाला घर बांधावयाचे होते, तर या पिकांवर कुणाला कर्जफेड करावयाची होती. प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने होती. मात्र या सर्व स्वप्नांचा क्षणात भंग झाला. हातात येणारा पैसा गारपिटीने हिरावून नेला.जोड आहे.