शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

शरद नेरकर, नामपूर

शरद नेरकर, नामपूरनाशिक जिल्‘ातच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. दर महिन्यात पाऊस, दर महिन्याला गारपीट, वादळ या व अशा नैसर्गिक घटनांमुळे शेतकरी भांबावला आहे. निसर्गचक्र बदलल्याने शेती व्यवसायाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेती व्यवसायात आता बदल करावा तरी काय अशा संभ्रमावस्थेत शेतकरी दिसत आहे. शंभरी पूर्ण केलेल्या जुन्याजाणत्या वयस्क शेतकर्‍यांना असे भयानक वर्ष आठवत नाही. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रकच बदललेले दिसत आहे.डाळींब, द्राक्ष, ऊस, कांदा या पिकांसाठी नाशिक जिल्हा विशेष प्रसिद्ध. भगवा, लाल डाळींब ही जिल्‘ाच्या डाळिंबांची खासियत. डोळ्यात पाणी आणेल परंतु चवीला गुळचट असलेल्या नाशिकच्या कांद्याची विशेष प्रसिद्धी, तर चवीला गोड व तोंडात टाकल्यावर पाणी होईल यासाठी देश- विदेशात मागणी असणारी नाशिकची द्राक्षे व श्रम करून मेहनतीने ही पिके घेऊन मोठा झालेला आमचा बळीराजा. मात्र सध्याची निसर्गाची अवस्था बघून मनाने, मानाने व अर्थार्जनाने मोठा झालेला शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. मनाने पुरता खचला आहे.द्राक्ष, कांदा, डाळींब ही पिके तशी बेभरवशाची. निसर्गाच्या अनुकूलतेवर यांचे अस्तित्व ठरते. द्राक्ष, कांदा ही पिके तर खूपच संवेदनशील. ढगाळ हवामानातील बदलामुळेसुद्धा ही पिके खराब होतात. यंदा दर महिन्यात पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानात वाढ होत आहे. पूर्वी केव्हातरी होणारी गारपीट ही नित्याची झाली आहे. ही गारपीट पिकांना मारक ठरते आहे. द्राक्षे काढणीला तयार होती. जिल्‘ातील निफाड, पिंपळगाव, मोसम, आरम या ठिकाणच्या द्राक्षबागांचे भावही ठरलेले होते. सौदेही झालेले होते. मात्र रात्रीतून गारपीट झाली. प्रचंड पाऊस झाला. निंबू, कांद्याच्या आकाराच्या गारा पडल्या. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेथे पक्व झालेले डाळींब या गारपिटीने फुटले, तर फुलावर असलेला फुलांचा गळ झाला. शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. कुणी मुला, मुलींचे लग्न ठरवले होते, कुणाला घर बांधावयाचे होते, तर या पिकांवर कुणाला कर्जफेड करावयाची होती. प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने होती. मात्र या सर्व स्वप्नांचा क्षणात भंग झाला. हातात येणारा पैसा गारपिटीने हिरावून नेला.जोड आहे.