शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मोदी सरकारवर सरन्यायाधीशांची टीका

By admin | Updated: July 2, 2014 04:19 IST

ज्येष्ठ वकील व माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रह्मण्यम यांचे नाव सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यासाठी ‘कॉलेजियम’ने मंजूर केलेले

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील व माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रह्मण्यम यांचे नाव सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यासाठी ‘कॉलेजियम’ने मंजूर केलेले असूनही ते अमान्य करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर भारताचे सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा यांनी टीका केली आहे.सरन्यायाधीश आणि इतर पाच ज्येष्ठतम न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायाधीशपदी नेमणुकीसाठी न्या. ए. के. मिश्रा व न्या. ए. के. गोयल या उच्च न्यायालयांच्या दोन मुख्य न्यायाधीशांसह गोपाल सुब्रह्मण्यम व रोहिंग्टन नरिमन या दोन ज्येष्ठ वकिलांच्या नावांचा एकत्रित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र ‘आयबी’ व ‘सीबीआय’ने दिलेल्या प्रतिकूल अहवालांच्या आधारे सरकारने सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीस असहमती दर्शविली व त्यांचे नाव वगळून इतर तीन नावांसंबंधीची फाइल नियुक्तीसाठी पुढे पाठविली होती.यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रथमच भाष्य करताना सरन्यायाधीश न्या. लोढा यांनी मंगळवारी म्हटले, की गोपाल सुब्रह्मण्यम यांचे नाव वेगळे काढण्याचे काम मला न कळविता व माझ्या संमतीशिवाय सरकारने एकतर्फी केले.’ न्यायसंस्थेच्या नि:पक्षतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असेही सरन्यायाधीशांनी ठासून सांगितले.गोपाल सुब्रह्मण्यम यांनी न्यायाधीशपदावरील नेमणुकीसाठी आधी दिलेली संमती मागे घेऊन न्यायसंस्था आपल्यामागे खंबीरपणे उभी न राहिल्याची तक्रार करणारे पत्रही सरन्यायाधीशांना लिहिले होते. ‘कॉलेजियम’ने आपला अधिकार आणि न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी तरी जाहीरपणे स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.सुब्रह्मण्यम यांच्या या पत्रानेही आपल्याला धक्का बसला, असे नमूद करून न्या. लोढा यांनी त्याबद्दल नाराजी नोंदविली. सरन्यायाधीश म्हणतात की, मी परदेशातून परत आल्यावर याविषयी चर्चा करू, तोपर्यंत वाट पाहावी, अशी मी गोपाल सुब्रह्मण्यम यांना विनंती केली होती. परंतु त्यांनी तसे न करता न्यायाधीशपदासाठी दिलेली संमती मागे घेणारे पत्र प्रसिद्ध केले.सरन्यायाधीशांनी असेही म्हटले की, सुब्रह्मण्यम यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मी त्यांना सांगितले होते पण त्याबदल्यात मला त्यांच्याकडून आता आपल्याला न्यायाधीश होण्यास स्वारस्य राहिले नसल्याचे कळविणारे ३० शब्दांचे पत्र मिळाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)