शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या चिंतांपासून देश मुक्त नाही

By admin | Updated: March 16, 2017 00:28 IST

भारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या. विद्यमान काळात त्या चिंतांपासून आजही देश मुक्त झालेला नाही, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी संपादित केलेल्या ‘द इसेन्शिअल आंबेडकर’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळयात केले.दिल्लीच्या मावळणकर सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळयात डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह शरद पवार, पी.चिदंबरम, सिताराम येचुरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. मुणगेकर यांनी सलग ७ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या १७ हजार ५00 पानांच्या लिखित चिंतनाचे ४३५ पानांमधे संपादन केले व ज्ञानसाधनेसाठी अलौकिक ग्रंथाची भर घातल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करतांना पी. चिदंबरम म्हणाले, अर्थशास्त्र, राज्यघटना, कायदा, राज्यशास्त्र, सामाजिक सुधारणांसह आधुनिक भारताच्या उभारणीत कोणत्या योजनांना अधिक महत्व द्यायला हवे, याचे प्रदीर्घ चिंतन शब्दबध्द करणारी आंबेडकरांसारखी व्यक्ती माझ्या पहाण्यात नाही. आंबेडकर वैज्ञानिक नसले त्यांची तुलना आईन्स्टाईन अथवा न्यूटन यांच्या बुध्दिमत्तेशीच करावी लागेल. आंबेडकरांनी शोषित, वंचित व दलित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. १९५६ साली त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर ५३ वर्षात भारताच्या सामाजिक स्थितीत दुर्देवाने फारसा फरक पडलेला दिसत नाही. अन्यथा हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाची आत्महत्या अथवा गुजराथच्या उना येथे मृत गायींचे कातडे काढणाऱ्या दलितांना जी भयंकर शिक्षा जमावाने दिली तशा दुर्देवी घटना घडल्या नसत्या.डॉ. आंबेडकर केवळ समाज सुधारक नव्हते तर अर्थकारणाबद्दलही त्यांनी सखोल चिंतन केले. ते आजही मार्गदर्शक ठरू शकते, असे नमूद करीत शरद पवार म्हणाले, प्रत्येक राज्याने आवश्यक प्रमाणात वीजनिर्मिती करावी व अतिरिक्त वीजनिर्मितीची ज्या राज्यांना गरज आहे, त्यांना ती पुरवता यावी, यासाठी नॅशनल ग्रीडची आंबेडकरांनी उभारणी केली. पाण्याच्या समस्येसाठी जलनीती आखतांना भाक्रा नानगलसारख्या धरणांच्या निर्मितीची संकल्पनाही त्यांच्या कारकिर्दीतच ठरली.प्रकाशन सोहळयाचे स्वागत रूपा पब्लिकेशनचे अतिश मेहरा यांनी केले. प्रास्ताविकात मनमोहनसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत डॉ. मुणगेकर म्हणाले, नियोजन आयोगात व राज्यसभेत डॉ. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यातला सुवर्णकाळ अनुभवण्याचा मला योग आला. जवळपास दिड तास चाललेल्या या सोहळ्यात सर्वच वक्त्यांची भाषणे लक्षवेधी झाली.