शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
3
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
4
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
5
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
6
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
7
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
8
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
9
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
10
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
11
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
12
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
13
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
14
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
15
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
16
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
17
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
18
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
19
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
20
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?

आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या चिंतांपासून देश मुक्त नाही

By admin | Updated: March 16, 2017 00:28 IST

भारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या. विद्यमान काळात त्या चिंतांपासून आजही देश मुक्त झालेला नाही, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी संपादित केलेल्या ‘द इसेन्शिअल आंबेडकर’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळयात केले.दिल्लीच्या मावळणकर सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळयात डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह शरद पवार, पी.चिदंबरम, सिताराम येचुरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. मुणगेकर यांनी सलग ७ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या १७ हजार ५00 पानांच्या लिखित चिंतनाचे ४३५ पानांमधे संपादन केले व ज्ञानसाधनेसाठी अलौकिक ग्रंथाची भर घातल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करतांना पी. चिदंबरम म्हणाले, अर्थशास्त्र, राज्यघटना, कायदा, राज्यशास्त्र, सामाजिक सुधारणांसह आधुनिक भारताच्या उभारणीत कोणत्या योजनांना अधिक महत्व द्यायला हवे, याचे प्रदीर्घ चिंतन शब्दबध्द करणारी आंबेडकरांसारखी व्यक्ती माझ्या पहाण्यात नाही. आंबेडकर वैज्ञानिक नसले त्यांची तुलना आईन्स्टाईन अथवा न्यूटन यांच्या बुध्दिमत्तेशीच करावी लागेल. आंबेडकरांनी शोषित, वंचित व दलित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. १९५६ साली त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर ५३ वर्षात भारताच्या सामाजिक स्थितीत दुर्देवाने फारसा फरक पडलेला दिसत नाही. अन्यथा हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाची आत्महत्या अथवा गुजराथच्या उना येथे मृत गायींचे कातडे काढणाऱ्या दलितांना जी भयंकर शिक्षा जमावाने दिली तशा दुर्देवी घटना घडल्या नसत्या.डॉ. आंबेडकर केवळ समाज सुधारक नव्हते तर अर्थकारणाबद्दलही त्यांनी सखोल चिंतन केले. ते आजही मार्गदर्शक ठरू शकते, असे नमूद करीत शरद पवार म्हणाले, प्रत्येक राज्याने आवश्यक प्रमाणात वीजनिर्मिती करावी व अतिरिक्त वीजनिर्मितीची ज्या राज्यांना गरज आहे, त्यांना ती पुरवता यावी, यासाठी नॅशनल ग्रीडची आंबेडकरांनी उभारणी केली. पाण्याच्या समस्येसाठी जलनीती आखतांना भाक्रा नानगलसारख्या धरणांच्या निर्मितीची संकल्पनाही त्यांच्या कारकिर्दीतच ठरली.प्रकाशन सोहळयाचे स्वागत रूपा पब्लिकेशनचे अतिश मेहरा यांनी केले. प्रास्ताविकात मनमोहनसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत डॉ. मुणगेकर म्हणाले, नियोजन आयोगात व राज्यसभेत डॉ. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यातला सुवर्णकाळ अनुभवण्याचा मला योग आला. जवळपास दिड तास चाललेल्या या सोहळ्यात सर्वच वक्त्यांची भाषणे लक्षवेधी झाली.