शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या चिंतांपासून देश मुक्त नाही

By admin | Updated: March 16, 2017 00:28 IST

भारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या. विद्यमान काळात त्या चिंतांपासून आजही देश मुक्त झालेला नाही, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी संपादित केलेल्या ‘द इसेन्शिअल आंबेडकर’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळयात केले.दिल्लीच्या मावळणकर सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळयात डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह शरद पवार, पी.चिदंबरम, सिताराम येचुरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. मुणगेकर यांनी सलग ७ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या १७ हजार ५00 पानांच्या लिखित चिंतनाचे ४३५ पानांमधे संपादन केले व ज्ञानसाधनेसाठी अलौकिक ग्रंथाची भर घातल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करतांना पी. चिदंबरम म्हणाले, अर्थशास्त्र, राज्यघटना, कायदा, राज्यशास्त्र, सामाजिक सुधारणांसह आधुनिक भारताच्या उभारणीत कोणत्या योजनांना अधिक महत्व द्यायला हवे, याचे प्रदीर्घ चिंतन शब्दबध्द करणारी आंबेडकरांसारखी व्यक्ती माझ्या पहाण्यात नाही. आंबेडकर वैज्ञानिक नसले त्यांची तुलना आईन्स्टाईन अथवा न्यूटन यांच्या बुध्दिमत्तेशीच करावी लागेल. आंबेडकरांनी शोषित, वंचित व दलित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. १९५६ साली त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर ५३ वर्षात भारताच्या सामाजिक स्थितीत दुर्देवाने फारसा फरक पडलेला दिसत नाही. अन्यथा हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाची आत्महत्या अथवा गुजराथच्या उना येथे मृत गायींचे कातडे काढणाऱ्या दलितांना जी भयंकर शिक्षा जमावाने दिली तशा दुर्देवी घटना घडल्या नसत्या.डॉ. आंबेडकर केवळ समाज सुधारक नव्हते तर अर्थकारणाबद्दलही त्यांनी सखोल चिंतन केले. ते आजही मार्गदर्शक ठरू शकते, असे नमूद करीत शरद पवार म्हणाले, प्रत्येक राज्याने आवश्यक प्रमाणात वीजनिर्मिती करावी व अतिरिक्त वीजनिर्मितीची ज्या राज्यांना गरज आहे, त्यांना ती पुरवता यावी, यासाठी नॅशनल ग्रीडची आंबेडकरांनी उभारणी केली. पाण्याच्या समस्येसाठी जलनीती आखतांना भाक्रा नानगलसारख्या धरणांच्या निर्मितीची संकल्पनाही त्यांच्या कारकिर्दीतच ठरली.प्रकाशन सोहळयाचे स्वागत रूपा पब्लिकेशनचे अतिश मेहरा यांनी केले. प्रास्ताविकात मनमोहनसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत डॉ. मुणगेकर म्हणाले, नियोजन आयोगात व राज्यसभेत डॉ. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यातला सुवर्णकाळ अनुभवण्याचा मला योग आला. जवळपास दिड तास चाललेल्या या सोहळ्यात सर्वच वक्त्यांची भाषणे लक्षवेधी झाली.