शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

आदिवासी, दलितांच्या ५२ टक्के आरक्षणासाठी काँग्रेस संघर्ष करणार राधाकृष्ण विखे : राज्य सरकाराचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

अहमदनगर : राज्यातील दलित, आदिवासी आणि ओबीसीचा आरक्षण कायदा मॅटने रद्द केला आहे. हे केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे झालेले असून आता सरकार जाणीवपूर्वक पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. या समाजासाठी लागू असणार्‍या ५२ टक्के आरक्षणाच्या संरक्षणासाठी सरकार विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

अहमदनगर : राज्यातील दलित, आदिवासी आणि ओबीसीचा आरक्षण कायदा मॅटने रद्द केला आहे. हे केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे झालेले असून आता सरकार जाणीवपूर्वक पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. या समाजासाठी लागू असणार्‍या ५२ टक्के आरक्षणाच्या संरक्षणासाठी सरकार विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने शासकीय सेवा व शिक्षणास अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षणाच्या सवलती देण्याचा कायदा २५ मे २००४ मध्ये लागू केला होता. संविधानातील तरतुदींचा आधार घेवून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवेत आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्यांना आहेत. त्यानुसार २००४ या कायद्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेण्यात आली असल्याचे विखे यांनी स्पष्ट केल होते.
आरक्षणाचा हा कायदा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅटने) २८ नोव्हेंबर २०१४ ला तो रद्द ठरविला. त्यानंतर या निर्णयाविरोधात राज्यातील युतीच्या सरकारने तातडीने अपील दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र, बेजबाबदार आणि सामाजिक जाणिव नसलेल्या शासनाकडून याचे गांर्भिय दाखविण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
मुदतीत हे अपील दाखल न झाल्याने राज्यातील दलित, आदिवासी आणि ओबीसीचे सामाजिक आरक्षण संपुष्टात येण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. हे आरक्षण संपुष्टात असल्यास राज्यातील एक मोठा समाज घटक आपल्या न्याय हक्कांपासून वंचित राहणार असल्याचे याव्दारे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देत असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले आहे.
.....................