शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला शस्त्रक्रियेची गरज

By admin | Updated: May 21, 2016 09:29 IST

चार राज्यांत पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला मोठ्या शस्त्रक्रियेची (सर्र्जरी) गरज असल्याचे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी घरचा अहेर दिला आहे.

नवी दिल्ली : चार राज्यांत पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला मोठ्या शस्त्रक्रियेची (सर्र्जरी) गरज असल्याचे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी घरचा अहेर दिला आहे. काँग्रेसने आसाम, केरळमधील सत्ता गमावली आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष यांच्याशी केलेली युती कामी आली नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया नोंदविली. निकाल निराशाजनक असले तरी अनपेक्षित नव्हते. पुरेसे आत्मपरीक्षण केले आहे. आता मोठी सर्जरी का करू नये, असा सवाल त्यांनी केला. गेल्या वेळी पराभवाच्या कारणमीमांसेसाठी आत्मपरीक्षण करतानाच जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने काम करू, असे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)>राहुल गांधींना बढतीची केवळ चर्चाच!उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदी बढती देण्यासह काँग्रेसमधील बहुचर्चित संघटनात्मक फेरबदल लवकरच पार पाडले जाण्याची चर्चा सुरू असतानाच दिग्विजयसिंग यांनी मोठ्या फेरबदलाची गरज प्रतिपादित केली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५४३ पैकी केवळ ४४ जागा जिंकल्या होत्या. पक्षाला ऐतिहासिक दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही अ.भा. काँग्रेस समितीमध्ये बदल करण्याच्या हालचाली वा चर्चा सुरू झालेल्या नाहीत. >काँग्रेस प्रादेशिक पक्षांच्या ‘खिचडी गटां’च्या मागे पडणार?विधानसभा निवडणुकीतील वाईट कामगिरीवरून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर लक्ष्य साधले. हा पक्ष रसातळाला लागला असल्याची टीका करतानाच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रादेशिक पक्षांच्या खिचडी गटांच्याही मागे पडणार काय, असा सवाल केला.काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित करताना हा अनेक नेत्यांची मिळून एकत्र बांधणी असलेला पक्ष होणार की निवडणुकांमधील अपयशानंतरही घराणेशाही असलेलाच पक्ष राहणार, अशीही विचारणा त्यांनी केली.केंद्र सरकार जनतेच्या व्यापक कल्याणासाठी पाचही राज्यांमधील निर्वाचित राज्य सरकारांना सोबत घेऊन काम करेल, अशी ग्वाही जेटली यांनी फेसबुकवरील आपल्या वक्तव्यात दिली.

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरीतील विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेनुरूप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जेटली म्हणाले की, २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर काँग्रेसची वेगाने पीछेहाट होत आहे. कारण तिची वागणूक शासन करणाऱ्या स्वाभाविक पक्षाप्रमाणे नव्हती. आज हा पक्ष संकटाच्या खाईत लोटला जात आहे.केरळमध्ये काँग्रेसचा पराभव झाला; कारण तेथे त्यांचे सरकार भ्रष्टाचार व घोटाळ्यात सामील होते. आसाममध्ये व्होटबँकेसाठी बेकायदेशीर स्थलांतरणाच्या पारंपरिक धोरणामुळे जनतेची नाराजी या पक्षाला भारी पडली. तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेस युतीत प्रचंड सुस्ती होती.