शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
3
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
4
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
5
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
6
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
7
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
10
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
11
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
12
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
13
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
14
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
15
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
17
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
18
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
19
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
20
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?

वाघांच्या सुरक्षेची पर्यावरण मंत्रालयाला चिंता

By admin | Updated: April 29, 2016 05:17 IST

पर्यावरण मंत्रालयाने आता खासदारांच्या सहकार्याने या वन्यजीवाचा बचाव, संरक्षण आणि उत्कृष्ट साधनांसाठी मोहीम सुरू केली आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- वाघांच्या नामशेष होत चाललेल्या प्रजातींमुळे चिंतित पर्यावरण मंत्रालयाने आता खासदारांच्या सहकार्याने या वन्यजीवाचा बचाव, संरक्षण आणि उत्कृष्ट साधनांसाठी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गतच बुधवारी मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सखोल विचारविनिमय झाला. यावेळी उपस्थित खासदार विजय दर्डा यांनी वाघांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उलचण्याची गरज व्यक्तकेली.पेंच व्याघ्र प्रकल्पातील लोकवस्त्या अन्यत्र हलविण्याची गरज आहे. कारण त्यांचा विपरीत परिणात होत आहे. याशिवाय याच क्षेत्रातील तोतलाडोह जलाशयात मासेमारी सुरूच असून सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यावरही परिस्थिती बदललेली नाही. हा प्रकार थांबविणे आवश्यक आहे, असा सल्ला दर्डा यांनीदिला. त्यांचे असे म्हणणे होते की, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रादरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग-७ चारपदरी केल्याने वाघांच्या कॉरिडोरला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाघ आणि इतर वन्यजीवांना सुरक्षित हालचाली करता याव्यात या दृष्टीने येथे भूयारी मार्ग अथवा उड्डाण पुलासारखा पर्याय वापरला जाऊ शकतो.विजय दर्डा यांनी स्पेशल टायगर फोर्समधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही उपस्थित केला. केंद्र सरकार आपल्या हिस्स्याचा निधी देत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असे ते म्हणाले. वाघांच्या अवैध शिकारींकडे लक्ष वेधून त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेसे उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची चर्चा करताना खा.दर्डा यांनी वाघांचे दर्शन होणाऱ्या मार्गांचा उल्लेख केला. सोबतच पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवे मार्ग शोधण्याचा सल्ला दिला. >ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, तेथे कडक सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे. कारण जानेवारी २०१५ पासून आतापर्यत १३ पेक्षा जास्त वाघांची शिकार झाली आहे. काही वाघांचा मृत्यू टेरिटोरियल विंगच्या आत झाला आहे. हे क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारितील असल्याने कोर क्षेत्राच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा बंदोबस्त केला जावा. >त्यांनी कोर एरियातील २० टक्के क्षेत्र पर्यटनासाठी खुले करण्यावरही भर दिला. सोबतच जिप्सी चालकांवर टाकण्यात येणार दबाव कमी करण्याची मागणी केली. पर्यटनाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रांमध्ये रिसोर्ट सुरू केले जावेत असे त्यांचे मत होते.सुरक्षेसाठी ड्रोनच्या वापरासंबंधी सूचनेची बैठकीला उपस्थित इतर सदस्यांनी भरपूर प्रशंसा केली.