शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

सीबीएसई दहावीची परीक्षा पुन्हा सुरू करणार?

By admin | Updated: October 22, 2016 01:09 IST

सहा वर्षांपूर्वी बंद केलेली सीबीएसई दहावीची बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा बंद केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त होत होती.

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीसहा वर्षांपूर्वी बंद केलेली सीबीएसई दहावीची बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा बंद केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त होत होती.निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु आम्हाला पुन्हा परीक्षा सुरू करायची आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पाच राज्यांचे मंत्री व पालकांनी परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. तथापि, संबंधित वर्गांमधून परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तरी त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला असावा, असे सरकारचे मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या २५ आॅक्टोबर रोजीच्या बैठकीत होईल. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, शिक्षणतज्ज्ञ व पालकांच्या संघटनांनी याबाबत निवेदने पाठवली आहेत. त्यात म्हटले आहे की, परीक्षा बंद करण्याच्या तसेच नापास न करण्याच्या धोरणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. याबरोबरच असे विद्यार्थी पुढे बारावीची बोर्ड परीक्षेचे थेट आव्हान पेलण्यास असमर्थ ठरत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होत आहे. करिअर ठरवण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे. परीक्षा नेमकी कधी सुरू करायची, याबाबत मतैक्य झालेले नाही; परंतु २०१८ मध्ये हा निर्णय लागू होऊ शकतो.सीबीएसई दहावीची परीक्षा २०१० मध्ये बंद करण्यात आली होती व त्याजागी सतत आणि समग्र मूल्यांकन (सीसीई) प्रणाली लागू करण्यात आली होती. त्याअंतर्गत संपूर्ण वर्षभर विविध चाचण्यांच्या आधारे ग्रेड देण्यात येत होते. आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयातही सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे. पाचवीपर्यंतच हा निर्णय लागू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.