शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

सीबीएसई दहावीची परीक्षा पुन्हा सुरू करणार?

By admin | Updated: October 22, 2016 01:09 IST

सहा वर्षांपूर्वी बंद केलेली सीबीएसई दहावीची बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा बंद केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त होत होती.

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीसहा वर्षांपूर्वी बंद केलेली सीबीएसई दहावीची बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा बंद केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त होत होती.निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु आम्हाला पुन्हा परीक्षा सुरू करायची आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पाच राज्यांचे मंत्री व पालकांनी परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. तथापि, संबंधित वर्गांमधून परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तरी त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला असावा, असे सरकारचे मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या २५ आॅक्टोबर रोजीच्या बैठकीत होईल. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, शिक्षणतज्ज्ञ व पालकांच्या संघटनांनी याबाबत निवेदने पाठवली आहेत. त्यात म्हटले आहे की, परीक्षा बंद करण्याच्या तसेच नापास न करण्याच्या धोरणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. याबरोबरच असे विद्यार्थी पुढे बारावीची बोर्ड परीक्षेचे थेट आव्हान पेलण्यास असमर्थ ठरत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होत आहे. करिअर ठरवण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे. परीक्षा नेमकी कधी सुरू करायची, याबाबत मतैक्य झालेले नाही; परंतु २०१८ मध्ये हा निर्णय लागू होऊ शकतो.सीबीएसई दहावीची परीक्षा २०१० मध्ये बंद करण्यात आली होती व त्याजागी सतत आणि समग्र मूल्यांकन (सीसीई) प्रणाली लागू करण्यात आली होती. त्याअंतर्गत संपूर्ण वर्षभर विविध चाचण्यांच्या आधारे ग्रेड देण्यात येत होते. आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयातही सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे. पाचवीपर्यंतच हा निर्णय लागू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.