शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास उमेदवारी होणार रद्द - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: November 2, 2016 12:02 IST

उमेदवाराने निवडणूक लढवताना शैक्षणिक माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - निवडणूक लढवताना शैक्षणिक माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. निवडणूक लढणा-या उमेदवाराची योग्य शैक्षणिक माहिती मिळणे मतदारांचा मुलभूत अधिकार आहे, आणि जर उमेदवाराने अर्जात चुकीची माहिती दिली असेल तर निवडणूक रद्द केली जाऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढवताना योग्य माहिती न दिल्यास उमेदवारी जाण्याची टांगती तलवार उमेदवारांवर असणार आहे. 
 
मणिपूरमधील काँग्रेस आमदार मैरीमबेम पृथ्वीराज यांनी आपल्या उमेदवारी अर्जात एमबीए शिक्षण घेतल्याची खोटी माहिती दिली होती. यासंबंधी करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत मतदारांना उमेदवारांसंबधी पुर्ण आणि योग्य माहिती मिळत नसेल तर मतदान हक्काचा काहीच अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान मैरीमबेम पृथ्वीराज यांची आमदारकी रद्द केली आहे. 
 
'निवडणूक लढणा-या उमेदवाराची माहिती सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभुमी असेल तर त्याला मत द्यायचं की नाही हा निर्णय तो घेऊ शकतो. शैश्रणिक पात्रता आणि संपत्ती पाहता निवडणूक लढवण्यास उमेदवार योग्य आहे की नाही हेदेखील मतदार ठरवू शकतात', असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलं आहे. 
 
काँग्रेस आमदाराने मात्र ही कारकुनी त्रुटी असल्याचा दावा केला, मात्र न्यायालयाने याचा परिणाम निवडणुकीवर झाला असल्याचं सांगत आमदारकी रद्द केली आहे. काँग्रेस आमदाराने 2008 विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे चुकीची माहिती दिल्याच आल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे.