शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भिष्णूर....

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

गारपीटग्रस्त शेतकरी आर्थिक विवंचनेत

गारपीटग्रस्त शेतकरी आर्थिक विवंचनेत
नुकसानभरपाईची मागणी : कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव
भिष्णूर : परिसरातील पिकांचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असतानाही अधिकाऱ्यांनी नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यामुळे परिसरातील शेतकरी मदतीपासून वंचित झाले. त्यातच यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात १२ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या शासनाकडे पोहविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, राज्यात वेगवेगळ्या भागात केंद्राची पथके पाहणीस येऊनही या भागातील गारपीटग्रस्तांना अद्यापही मदत न मिळाल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
भिष्णूर परिसरात ५ ऑक्टोबर २०१४ ला मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात संत्रा, मोसंबी, कपाशी, तूर व भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत व कायमस्वरूपी योजना राबवून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज होती. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी नुकसान न झाल्याचे दाखवून या परिसरातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गारपीटग्रस्त भागातील नुकसानीचे प्रमाण तालुका कृषी अधिकारी, तलाठी कार्यालयाने चुकीचे दिल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, प्राथमिक अहवालामध्ये पिकांचे ५० टक्क्यांच्या आत नुकसान झाले आहे, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांनी पिके घरी आणलीच नाही. ती पूर्णत: भुईसपाट झाली. त्यामुळे या परिसरातील नुकसानीचा पुन्हा सर्व्हे करून नवीन अहवालानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या भागातील भिष्णूर, थाटुरवाडा, नायगाव, खुशालपूर, पारडसिंगा, खापरी (केने), विवरा, रोहणा आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु, त्यांना अद्यापही नुकसानभरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या भागातील वीज वितरण कंपनीला कृषिपंपांचे बिल माफ करण्याचे आदेश न मिळाल्यामुळे वीज बिलांच्या थकबाकीसाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडील वीज जोडणी तोडल्यामुळे त्यांना ओलितापासून वंचित व्हावे लागत आहे. यावरही शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. (वार्ताहर)