शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात ७५ रजिस्टर जीर्ण : भांडार विभागाला तब्बल १० वेळा पत्र देऊनही दुर्लक्ष

By admin | Updated: June 14, 2016 00:22 IST

जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वेळा पत्र पाठवून पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात येण्याची भिती आहे.

जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वेळा पत्र पाठवून पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात येण्याची भिती आहे.
मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातील नोंदीचे दाखले नागरिकांना विविध शासकीय व शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असतात. मात्र या महत्वाच्या विभागाबाबत मनपा प्रशासनाची अत्यंत अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड गहाळ
जुनी नपातून मनपाच्या इमारतीत स्थलांतर करताना जन्म-मृत्यू विभागातील नोंदीचे अनेक रजिस्टरच गहाळ झाले आहेत. त्यात जन्माच्या नोंदींचे १९५६, १९७७, १९७९, १९६७, १९६८च्या डिसेंबर महिन्याच्या नोंदी असलेले रजिस्टर गहाळ झाले आहेत. तर मृत्यूच्या १९५२, १९५३,१९५४, १९५६, १९५९, १९६१ यावर्षीर्ंच्या नोंदीचे रजिस्टर गहाळ झाले आहेत. त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील टिपणीही तयार आहे. मात्र तरीही आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कालावधीत जन्म अथवा मृत्यूची नोंद असल्यास त्याचे दाखले नागरिकांना मिळू शकत नाहीत. त्यांना कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र करून घेण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मनपाच्या चुकीची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहे.
संगणकीकरण आवश्यक
जन्म-मृत्यूच्या नोंदींचे रजिस्टर ठेवण्यासोबतच त्यांचे संगणकीकरणही करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही मनपाचे दूर्लक्ष झाले आहे. या विभागातील रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. मनपात १९०१ पासूनच्या नोंदींचे रेकॉर्ड आहे. त्यापैकी १९०० ते १९२३ पर्यंतच्या नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या आता कुणालाच वाचता येत नसल्याने ते रजिस्टर पडून आहेत. मात्र १९२३ पासूनचे रेकॉर्ड मराठीत आहे. ते हाताळून जीर्ण झाले आहे. अगदी २०१३ च्या नोंदींचे रजिस्टर देखील जीर्ण होऊन त्यातील पाने मोकळी झाली आहेत. याबाबत भांडार विभागाला पानांचे लॅमिनेशन व रजिस्टरचे बाईंिडंग करण्याबाबत तब्बल १० वेळा पत्र लिहून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
इतर अडचणींकडेही कानाडोळा
जन्म-मृत्यू नोंद विभागातील मृत्यू पावती पुस्तके, मृत्यू फॉर्म नं.४ इंग्रजी, जन्म-मृत्यू पुस्तके नोंदणी रजिस्टर व अनुपलब्धता प्रमाणपत्र व त्याचे मुळ कव्हरिंग लेटर संपलेले आहे. त्याबाबतही पाठपुरावा सुरूआहे.