शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशात ५३% जलदगती न्यायालये बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 03:33 IST

जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबत पंतप्रधान कार्यालय अथवा कायदा आणि न्यायिक खात्याने कोणतेही आदेश काढले नसल्याची व गेल्या पंधरा

मुंबई : जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबत पंतप्रधान कार्यालय अथवा कायदा आणि न्यायिक खात्याने कोणतेही आदेश काढले नसल्याची व गेल्या पंधरा वर्षांत देशातील ५३% जलदगती न्यायालये बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील ६३ जलदगती न्यायालयेही बंद झाली आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भातील माहिती मागितली होती. यावर ही माहिती देण्यात आली आहे. न्याय विभागाचे अवर सचिव पी. पी. गुप्ता यांनी याबाबतची अचूक माहिती दिली नाही. परिणामी कार्यकर्त्याने दाखल केलेल्या अपिलावर भारत सरकारच्या न्याय विभागाचे संचालक प्रशांत कुमार पोनूगोती यांनी यासंदर्भातील कोणतेही आदेश पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेले नाहीत आणि याची जबाबदारी संबंधित राज्याची आहे, असे स्पष्ट केले.देशातील २९ राज्यांत एकूण १७३४ जलदगती न्यायालयांना २००० साली मंजुरी देण्यात आली. सद्य:स्थितीमध्ये केवळ ८१५ जलदगती न्यायालये कार्यरत आहेत. बिहार राज्यात सर्वाधिक म्हणजे १७९ तर महाराष्ट्रात ९२, मध्य प्रदेश ८४, पश्चिम बंगाल ७७, आंध्र प्रदेशात ७२ जलदगती न्यायालये कार्यरत आहेत. गुजरातमध्ये पाच वर्षे १६६ जलदगती न्यायालये सुरू होती. मात्र त्यापैकी १०५ बंद झाल्याने आता ६१ कार्यरत आहेत. मध्य प्रदेशात ८५ पैकी ८४, महाराष्ट्रातील १८७ पैकी ९२, आंध्र प्रदेशातील ८६ पैकी ७२, बिहारमधील १८३ पैकी १७९, छत्तीसगढमधील ३१ पैकी २१, हरियाणातील ३६ पैकी ६, जम्मू-काश्मीरमधील १२ पैकी ५, झारखंडमधील ८९ पैकी ११, कर्नाटकातील ९३ पैकी ३९, मणिपुरातील ३ पैकी २, नागालँडमधील ३ पैकी २, ओरिसा येथील ७२ पैकी ३०, पंजाबमधील २९ पैकी २०, सिक्कीममधील ३ पैकी १, तामिळनाडूमधील ४९ पैकी ३२, त्रिपुरामधील ३ पैकी २, पश्चिम बंगाल येथील १५२ पैकी ७७ जलदगती न्यायालये कार्यरत आहेत.