शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

४० हजार कोटींची खत सबसिडी केंद्राकडे थकली

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या खत कंपन्यांनी केंद्र सरकारकडे थकलेली सबसिडी त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या खत कंपन्यांनी केंद्र सरकारकडे थकलेली सबसिडी त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे. खत कंपन्यांची संघटना फर्टिलायझर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (एफएआय) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. असोसिएशनचे महासंचालक सतीश चंदर यांनी सांगितले की, खत कंपन्यांना देय असलेली ४0 हजार कोटींपेक्षाही जास्त सबसिडी केंद्र सरकारकडे थकली आहे. एवढी मोठी रक्कम अडकून पडल्यामुळे कंपन्यांकडे कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसा राहिलेला नाही. आॅगस्ट २0१४ पासून सरकारने कंपन्यांना सबसिडी दिलेली नाही. पैशांअभावी अनेक कंपन्यांना आपले प्रकल्पच बंद करावे लागले आहेत, असे अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात असोसिएशनने म्हटले आहे. चंदर यांनी म्हटले की, स्वदेशी कंपन्यांना अनेक महिन्यांपासून सबसिडी अदा न करणारे सरकार विदेशी पुरवठादारांना मात्र वेळच्या वेळी पैसा पुरवीत आहे. इतकेच नव्हे, तर विदेशी पुरवठादारांना आगाऊ रकमाही दिल्या जात आहेत. स्वदेशी कंपन्यांविषयीचा हा भेदभाव अकल्पनीय आहे. अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात खत कंपन्यांनी म्हटले की, मार्च २0१५ पर्यंत संपूर्ण खत उत्पादकांची एकूण सबसिडीची थकबाकी ४0 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. देशांतर्गत युरिया उत्पादकांच्या सबसिडीची रक्कम यंदा ३0 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)४सूत्रांनी सांगितले की, शेतकऱ्यांना खते स्वस्तात मिळावीत यासाठी सरकार खतांच्या मूळ किमतीवर मोठी सबसिडी देते. सरकारकडून मिळालेल्या सबसिडीची रक्कम वजा करून कंपन्या खतांच्या किमती कमी ठेवते.४ गेल्या वर्षी आॅगस्टपासून सबसिडी थकल्यामुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन थांबविले आहे. त्याचा फटका बसून देशात रबी हंगामासाठी खतांची टंचाई निर्माण झाली होती. पंजाब, हरियाणा या राज्यांत खतांची सर्वाधिक टंचाई दिसून आली.