शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

महिला आरक्षणामुळे चित्र पालटणार

By admin | Updated: January 8, 2017 00:46 IST

घडामोडींना वेग : वणी गटात इच्छुकांची निराशा

प्रवीण दोशी वणीजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय आखाडा तयार झाला असून, वणी गट व गण महिला आरक्षित झाल्याने विद्यमानांचा हिरमोड झाला आहे. यामुळे दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी वरकरणी सुरू झाली आहे.हक्काचा मतदारसंघ महिलांच्या ताब्यात गेल्याने राजकीय चित्र पूर्णत: बदलले आहे. वणी व लखमापूर अशा दोन गणांचा समावेश असलेल्या वणी गटावर शिवसेनेचे बाळासाहेब गांगुर्डे जिल्हा परिषद गटात, वणी गणात शिवसेनेचे अ‍ॅड. विलास निरगुडे व लखमापूर गणात शिवसेनेचे गणेश शार्दुल विद्यमान सदस्य आहेत. गट व गण शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेला हा गड सुरक्षित आहे, असे मानले जाते. बाळासाहेब गांगुर्डे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश गांगुर्डे यांचा अवघ्या १८ मतांनी पराभव करून जिल्हा परिषद सदस्याचा मान मिळविला होता, तर वणी गणातून अ‍ॅड. विलास निरगुडे यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. लखमापूर गणातील गणेश शार्दुल यांनीही विजयश्री खेचून आणली; मात्र आता चित्र बदलले आहे. कसबे वणी गट व गटातील दोन्ही गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. कसबे वणी गटातील गावे पुढीलप्रमाणे- वणी गण : वणी, मावडी, बाबापूर, मुळाणे, संगमनेर, रामनगर, ओझरखेड, कृष्णगाव. लखमापूर गण : लखमापूर करंजवण, खेडले पिंपरखेड, दहेगाव, पुणेगाव, फोपशी, काजीमाळे, वलखेड, कादवा, म्हाळुंगी, ओझे, वागळुद, म्हेळुस्के परमोरी आदि २२ गावांचा गटात समावेश आहे. सुमारे ४५ हजारांच्या जवळपास मतदार आहेत. जि. प. गटातून सुभाष गांगुर्डे यांनी, तर पंचायत समितीच्या माध्यमातून शिवसेना गटनेता म्हणून विलास निरगुडे व गणेश शार्दुल यांनी विकासाला अग्रक्र म दिला असला तरी तिन्ही जागा यंदा महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमानांचा अपेक्षाभंग झाला आहे. गटासाठी राष्ट्रवादीतर्फे वणीच्या विद्यमान सरपंच सुनीता भरसठ यांची दावेदारी प्रबळ मानली जाते आहे, तर ग्रामपंचायत सदस्य छाया गोतरणे याही स्पर्धेत आहेत. शिवसेनेने आपले पत्ते अजून उघडलेले नसून ऐनवेळी सक्षम व प्रभावी उमेदवार मैदानात उतरविण्याची व्यूहरचना आखली आहे. कॉँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, तर माकपही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयारीला लागला आहे. मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या जिल्हा परिषदेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांनी पत्नींना उभे करून सत्तेची दोरी हातात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या गटात रंगत आहे. दरम्यान, चालू निवडणुकीचे गणित पक्षापेक्षा व्यक्ती हे असू शकते, याचाच आधार घेत इच्छुक सावधगिरीने पावले टाकत आहेत. हीच स्थिती थोड्या फार फरकाने पंचायत समितीच्या दोन्ही गणांसाठीसुद्धा आहे. मात्र या ठिकाणी इच्छुकांची वानवा असल्याने जिल्हा परिषद नाही तर पंचायत समिती अशीही शक्यता नाकारता येत नाही. वणी गट तसेच दोन्ही गणांवर प्रस्थापित वर्चस्व राखण्यासाठी नियोजन आखत असले तरी अस्तित्वाची लढाई सोपी नक्कीच नाही.