शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

का आत्ताच पराभव दिसू लागला?

By admin | Updated: January 7, 2017 00:56 IST

‘नाशिककर मते देणार नसतील तर कोण येथे येईल’

नाशिक : नाशिकमध्ये इतकी विकासकामे करूनही जर नाशिककर मतदान करणार नसतील तर कोण कशाला येथे पुन्हा येईल? असा सवाल करून नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरच नव्हे तर स्वपक्षातील निवडणूक इच्छुकांना पराभूत मानसिक गर्तेत लोटून निवडणुकीपूर्वीच स्वत:चा पराभवही मान्य केल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. मुळात राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन येथील जनतेचे प्रतिनिधित्व करावे, असा आग्रह त्यांना कोणी व कधी धरल्याचे ऐकिवात नसले तरी, गेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका करीत, ‘एकदा सत्ता द्या, कसा सुतासारखा सरळ करतो’ अशी भीमगर्जना करणाऱ्या ठाकरे यांचे निराशाजनक वक्तव्य पाहता त्यांना पाच वर्षांनंतरही सूत सरळ करता आले नाही हेदेखील स्पष्ट झाले आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाच वर्षे केली नाहीत इतकी लोकार्पणे करण्यास सुरुवात केली व त्यासाठी खुद्द राज ठाकरे यांनाच नाशिक वाऱ्या कराव्या लागल्या आहेत. नाशिककरांनी सत्ता ताब्यात दिल्यावर मुक्कामी राहून नाशिकचा विकास करू, असे आश्वासन देणाऱ्या ठाकरे यांना सत्ताप्राप्तीनंतर नाशिककरांचा तसा विसरच पडला, त्यामुळेच की काय त्यांच्याच नावाने व करिष्म्याने निवडून आलेल्या ४० पैकी २६ नगरसेवकांनी त्यांची साथ सोडून अन्यत्र घरोबा केला. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला एकामागोमाग बसत असलेल्या धक्क्यातून पक्ष कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच खासगी विकासकांच्या मदतीने साकारण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने ठाकरे यांना पुन्हा नाशिकची आठवण आली. नाशिकमध्ये विकासकामे करूनही मतदार मतदान करणार नसतील तर कशाला येथे यायचे, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना करून स्वत:च राजकीय भवितव्याविषयी साशंक असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थातच ठाकरे यांनी कोणत्या एजन्सीमार्फत सर्व्हे केला की ज्योतिषाकडे हात दाखवून (तसा त्यांचा ज्योतिषावर विश्वास नसल्याचे त्यांनी जाहीर केले, परंतु हातात रंगीबेरंगी अंगठ्या कायम ठेवल्या) निष्कर्ष काढला हे समजू शकले नसले तरी, मनसेत जी थोडीफार धुगधुगी असल्याचे समजून ज्यांनी आगामी महापालिका निवडणुकीची तयारी चालविली त्यांच्या मात्र छातीत धस्स झाले. पक्षप्रमुखालाच खात्री नसेल तर उमेदवाराला ती कशी असेल असा साहजिकच पडणारा प्रश्नही त्यातून निर्माण झाला आहे. एकमात्र खरे ज्यांनी राजकीय हवा पाहून मनसेतून काढता पाय घेतला त्या पदाधिकारी व नगरसेवकांना मात्र ‘बरे झाले बाहेर पडलो’ याचा आनंद ठाकरे यांच्या उपरोक्त विधानावरून झाला आहे. परंतु जे मनसेतून गेले ते नंतर पश्चाताप करतील हे ठाकरे यांचे दुसरे विधानही काहीसे चक्रात टाकणारे असून, जर नागरिक मतदानच करणार नाही असा ठाकरे यांचा होरा असेल तर पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांचा आनंद वाटावा की पश्चाताप? अर्थातच ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पक्ष सोडणाऱ्यांना पश्चाताप होणार असेल तर त्यामागे एकतर त्यांना मनसेकडून उमेदवारी घेऊन पराभवाची चव चाखावी लागणार नाही, असे ठाकरे यांना म्हणावयाचे असेल किंवा इतकी पडझड होवूनही नाशिककर पुन्हा आपल्याच बाजूने कौल देतील, अशी भोळी आशा ठाकरे यांनी बाळगली असेल.