शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सापगावची पाणी टंचाई मिटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 19:40 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव या पाणी टंचाईने त्रस्त गावाच्या पाणी प्रकल्पाचे डॉ.संजीवनी पवार यांच्या हस्ते अमृतकुंभ या नावाने टाकीचे नामकरण होऊन लोकार्पण करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमने टँकर मुक्त केलेले हे १४ वे गाव आहे. या पाणी प्रकल्पाला लागणारा संपूर्ण निधी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ कै. आप्पासाहेब पवार यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध करु न दिला.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : सोशल नेटवर्कींग फोरम जलाभियानचा उपक्रम ; प्रकल्पाचे लोकार्पण

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव या पाणी टंचाईने त्रस्त गावाच्या पाणी प्रकल्पाचे डॉ.संजीवनी पवार यांच्या हस्ते अमृतकुंभ या नावाने टाकीचे नामकरण होऊन लोकार्पण करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमने टँकर मुक्त केलेले हे १४ वे गाव आहे. या पाणी प्रकल्पाला लागणारा संपूर्ण निधी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ कै. आप्पासाहेब पवार यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध करु न दिला.यावेळी डॉ.अभिमन्यू पवार, रतनलाल भंडारी यांच्या हस्ते टाकीचे पूजन करण्यात आले. तसेच एका वितरण स्थानावरील नळांवर हंड्यात पाणी सुरु करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च श्रीलेखा पाटील, डॉ. प्रतीक्षा सिदीड, प्रणोती कवडे, डॉ. प्रविणा पवार, डॉ.समीर पवार यांनी केला.याप्रसंगी अप्पासाहेबांच्या पत्नी डॉ. संजीवनी यांनी मनोगत व्यक्त केले.सापगावला पाणी आल्याने गावातील अनेक समस्या सुटणार आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांनी गाव हागणदारी मुक्त करणे आणि पावसाळ्यात जास्तीत जास्त रोपं लावून वृक्ष संवर्धन करावे असे आवाहन फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केले.प्रकल्प यशस्वीतेसाठी प्रमोद गायकवाड, प्रशांत बच्छाव, डॉ. पंकज भदाणे, रामदास शिंदे, संदीप डगळे, दादा दिवे, उषा बेंडकुळी, मच्छींद्र कांबळे, बबन दिवे, काळू दिवे, ग्रामसेविका सारिका जगताप यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्र माला डॉ. वसंत कवडे, डॉ. नंदिनी पवार, अविनाश गुंजाळ, सहर्ष जोशी, समिर भादुरे, अभिजीत थोरात, प्रदिप बात्रा, सतिष दाणी, डॉ. आशुतोष भट, संदिप निमसे, राहूल कदम, प्रा. आशिष चौरसीया, प्रा.जोशी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.इन्फो.....सापगावाचे दरवर्षी पाण्यासाठी खूप हाल व्हायचे. सोशल फोरमच्या या प्रकल्पामुळे आमची पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटल्यामुळे आम्ही सर्व अतिशय आनंदात व समाधानी आहोत.- भारती दिवे, सरपंच, सापगाव.चौकट.......सापगावचा प्रश्न असा सोडवला.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव हे गाव नाशिकपासून अवघ्या ३० किलोमीटरवर आहे. पण गेली अनेक वर्षे प्रत्येक उन्हाळा या गावासाठी जीवघेणा ठरायचा. गावाजवळील दोनही विहिरी जानेवारीनंतर कोरड्या पडल्या कि गावकऱ्यांचे पाणी मिळवण्यासाठी प्रचंड हाल होत असत. एकतर अडीच किलोमीटरवरील नाल्यातून रात्री अपरात्री डोक्यावर पाणी आणणे किंवा टँकरवर अवलंबून राहणे हे दोनच पर्याय. अशा वेळी गावकºयांना सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकर मुक्ती अभियानाची माहिती मिळाली आणि त्यांनी फोरमकडे संपर्क साधला. फोरमच्या टीमने गावाची पाहणी केली आणि लक्षात आले कि अडीच किलोमीटरवरील नाल्याला वर्षभर पाणी असते. त्यावर विहीर खोदून पाइपलाइनने गावात पाणी आणले कि कायमस्वरूपी समस्या सुटू शकते. त्याप्रमाणे गावकºयांवर श्रमदानातून विहीर खोदण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. फोरमने पाईपलाईन, मोटार, गावातील टाकीची डागडुजीची जबाबदारी घेतली. आश्चर्य म्हणजे केवळ ८ फुटांवर भरपूर पाणी लागले. तिथून गावात पाणी लिफ्ट करून गावातील विवीध भागात वितरीत करण्यात आले.(फोटो २३ सापगाव)