शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

नाशिकच्या धरणांमध्ये जेमतेम पाणी

By admin | Updated: June 9, 2017 16:47 IST

पावसाची प्रतीक्षा; अन्यथा गंभीर संकट

नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर व समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यामध्ये जेमतेम पाणी शिल्लक राहिल्याने हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून बरसला नाही तर गंभीर संकट निर्माण होण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठी धरणे सात, तर मध्यम धरणांची संख्या १७ असल्याने पाणी साठवणुकीच्या एकूण २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी सरासरी १०२ टक्के पाऊस झाल्याने आॅक्टोबर अखेर ९२ टक्के पाणीसाठा झाला होता, त्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले. धरणांच्या पाण्यावर विविध प्रकारचे आरक्षण असल्याने डिसेंबरपासून आवर्तने सुरू करण्यात आली, त्यात विशेष करून नाशिक जिल्ह्यातून मराठवाडा, जळगाव, नगर जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात आले. धरणांतील शिल्लक पाणी जुलै अखेर पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले मात्र मार्च महिन्यांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावली शिवाय सिंचन व बिगर सिंचनासाठी वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धरणातील पाण्याचा वापरही वाढला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी बारा टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. त्यातही नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २३ टक्के इतका समाधानकारक साठा असला तरी, अन्य अकरा धरणांनी तळ गाठला. अन्य धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता जेमतेम १२ टक्के पाणी सध्या शिल्लक असून, पाण्याची मागणी व उपलब्ध साठ्याचा विचार करता पाऊस वेळेवर बरसण्याची प्रतीक्षा आहे.यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, गत वर्षीच्या तुलनेत तो सरासरी बरसणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात ३ जून रोजी सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून आशादायी चित्र निर्माण केले असले तरी, मृग नक्षत्राचे आगमन होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटूनही पावसाची हजेरी लागलेली नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकर भरण्यासाठी वापरले जाणारे पाण्याचे स्त्रोतही आटू लागले आहेत.

प्रमुख धरणांमध्ये शिल्लक पाणीगंगापूर-१६, पालखेड-१४, करंजवण-६, ओझरखेड-१४, दारणा-३, नांदूरमध्यमेश्वर-३७, चणकापूर-२७, गिरणा-२५, पुनद-२० टक्के इतके पाणी शिल्लक आहे. आळंदी, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत.