शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

नाशिकच्या धरणांमध्ये जेमतेम पाणी

By admin | Updated: June 9, 2017 16:47 IST

पावसाची प्रतीक्षा; अन्यथा गंभीर संकट

नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर व समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यामध्ये जेमतेम पाणी शिल्लक राहिल्याने हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून बरसला नाही तर गंभीर संकट निर्माण होण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठी धरणे सात, तर मध्यम धरणांची संख्या १७ असल्याने पाणी साठवणुकीच्या एकूण २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी सरासरी १०२ टक्के पाऊस झाल्याने आॅक्टोबर अखेर ९२ टक्के पाणीसाठा झाला होता, त्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले. धरणांच्या पाण्यावर विविध प्रकारचे आरक्षण असल्याने डिसेंबरपासून आवर्तने सुरू करण्यात आली, त्यात विशेष करून नाशिक जिल्ह्यातून मराठवाडा, जळगाव, नगर जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात आले. धरणांतील शिल्लक पाणी जुलै अखेर पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले मात्र मार्च महिन्यांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावली शिवाय सिंचन व बिगर सिंचनासाठी वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धरणातील पाण्याचा वापरही वाढला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी बारा टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. त्यातही नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २३ टक्के इतका समाधानकारक साठा असला तरी, अन्य अकरा धरणांनी तळ गाठला. अन्य धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता जेमतेम १२ टक्के पाणी सध्या शिल्लक असून, पाण्याची मागणी व उपलब्ध साठ्याचा विचार करता पाऊस वेळेवर बरसण्याची प्रतीक्षा आहे.यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, गत वर्षीच्या तुलनेत तो सरासरी बरसणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात ३ जून रोजी सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून आशादायी चित्र निर्माण केले असले तरी, मृग नक्षत्राचे आगमन होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटूनही पावसाची हजेरी लागलेली नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकर भरण्यासाठी वापरले जाणारे पाण्याचे स्त्रोतही आटू लागले आहेत.

प्रमुख धरणांमध्ये शिल्लक पाणीगंगापूर-१६, पालखेड-१४, करंजवण-६, ओझरखेड-१४, दारणा-३, नांदूरमध्यमेश्वर-३७, चणकापूर-२७, गिरणा-२५, पुनद-२० टक्के इतके पाणी शिल्लक आहे. आळंदी, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत.