शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

बिजोटे येथे पाणी परिषद

By admin | Updated: September 12, 2015 00:11 IST

सुभाष भामरे : हरणबारी डावा व उजवा कालव्याच्या कामासाठी मदतीचे आश्वासन

जायखेडा : सततच्या दुष्काळामुळे शेतोपयोगी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून, शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. यामुळे पाण्याचे महत्त्व व सिंचनाची गरज शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाचा डावा व उजवा कालवा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.यासंदर्भात बिजोटे येथे पाणी परिषद घेण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुभाष भामरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शेषराव पाटील, डॉ. विलास बच्छाव, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, गजेंद्र अमाळकर, नगरसेवक साहेबराव सोनवणे, अण्णासाहेब सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक ह्याळीज, सुभाष कांकरिया, संजय भामरे आदि मान्यवर उपस्थित होते.खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन हरणबारी डावा व उजवा कालव्याच्या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून काम पूर्णत्वास नेऊन येत्या काही दिवसात सटाणा तालुक्यातील सिंचनाची रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेप्रमाणेच लोकसहभागातून हे सरकार जलयुक्त शिवार अभियान गावागावापर्यंत पोहचवून शेतीचा विकास साधणार आहे. हरणबारी उजवा व डावा कालवा मार्गी लावण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभाग घेण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खिरमानी येथील केशव भदाणे, पिंगळवाडेचे कृष्णा भामरे, हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर ह्याळीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताणे, पारणेर, बिजोटे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, आसखेडा, कोटबेल, खिरमाणी, कुपखेडा, नळकेस, सारदे, रामतीर, वायगाव, सुराने, दुंधे, देवळाने, रातीर, सातमाने आदि गावातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)