शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

दारणातून हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: February 13, 2017 00:10 IST

पाणीटंचाईचे सावट : तातडीने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी

बेलगाव कुऱ्हे : धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुका प्रसिद्ध आहे. मराठवाड्याला पाणी पाजणारे ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या ५२ गेटमधून गेल्या एक महिन्यापासून गळती लागल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असून, खूप मोठे नुकसान होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन दारणा धरण भरले होते; मात्र धरणातून हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्यातून मुख्य जलसाठ्यावर परिणाम होत असल्याने पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पूर्वभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. आताच जर उर्वरित जलसाठ्यामधील पाणी वाहून गेले तर येणाऱ्या परिस्थितीला मोठे तोंड द्यावे लागू शकते. सदर गळती थांबविण्याची मागणी पूर्वभागातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणांची निर्मिती झाल्यापासून गेल्या शतकापासून दारणा धरणामधील गाळ काढला नसल्याने त्यातील पाण्याचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. दरम्यान, धरणांच्या जवळ राहणाऱ्या महिलांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते.