शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

बोगदा खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा

By admin | Updated: January 12, 2016 23:11 IST

अपेक्षा : प्रजासत्ताक दिनी व्हावा निर्णय

 इंदिरानगर : गोविंदनगरकडे जाणारा बोगदा बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असताना प्रजासत्ताक दिनी तरी बोगद्यातून जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य मिळेल का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारक ांनी उपस्थित केला आहे. इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणारा बोगदा सुमारे सात महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अचानक बंद करण्यात आला. यासंबधी पोलीस प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसताना ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह सामाजिक संस्था, राजकीय नेते मंडळींकडून कार्यवाहीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बोगद्याच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये असलेल्या तीव्र भावना लक्षात घेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आंदोलनही केले. मात्र पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत सामाजिक व राजकीय संघटनांनी केलेली आंदोलनांची कोणतीही दखल घेतली गेली नाही. इंदिरानगर परिसरातील हजारोंच्या संख्येने असलेल्या वाहनधारकांना पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत आहे. वाहनधारकांना सुमारे तीन कि.मी. अंतराचे वळण घेऊन लेखानगर समोरील बोगद्यातून ये-जा करावी लागत आहे, तर जॉगिंग ट्रॅकच्या समांतर रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे, परंतु समोरून येणाऱ्या वाहनधारकांचा हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असल्याचा समज होतो. त्यामुळे त्यांच्याकडून दुहेरी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, परिसरात अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.इंदिरानगरक डून गोविंदनगरकडे जाण्यासाठी बोगदा सुरू करावा, अशी मागणी होत असून त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय कमी होणार आहे. बोगदा बंद असल्याने इंदिरानगरवासीयांची मोठी अडचण होत असल्याने प्रजासत्ताक दिनी तरी बोगदा सुरू करून परिसरातील नागरिकांना आनंदाची बातमी द्यावी, अशी मागणी होत आहे.