शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अशासनमान्य संघटना शासनाकडून बेदखल

By admin | Updated: January 9, 2017 01:45 IST

निर्णय : २६० संघटनांच्याच मागण्यांचा होणार विचार

नाशिक : राज्य सरकारने मान्यता दिलेल्या संंघटनांच्या व्यतिरिक्त अमान्य शासकीय संघटनांच्या मागण्या व निवेदनांचा यापुढे विचार न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, राज्यातील फक्त २६० संघटनांनीच केलेल्या मागण्यांचाच यापुढे विचार केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, अनेक संघटना या श्रमिक अधिनियमाखाली, धर्मादाय आयुक्त यांच्या अंतर्गत नोंदणीकृत असून, तसे लेटर हेडवर छापून त्या शासन मान्य असल्याचे समजून शासनाकडे पत्रव्यवहार करीत असतात. अशा संघटनांची निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वा संघटनांकडून थेट शासनास प्राप्त होत असतात. यासंदर्भात सन १९९१ व २०११ मध्येदेखील शासनाने अशासनमान्य संघटनांच्या निवेदनांची दखल घेऊ नये, असे ठरविण्यात आलेले असतानाही पुन्हा पुन्हा हे प्रकार घडू लागले असल्यामुळे शासनाने पुन्हा या संदर्भात आदेश काढून दखल न घेण्याचा पुनरुच्चार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये यांच्याकडे संघटनांची निवेदने प्राप्त झाल्यास त्या संघटनांच्या लेटरहेडवर शासन व मान्यता प्राप्त असल्याचा सामान्य प्रशासन विभागद्वारा निर्गमित शासन आदेशाचा क्रमांक व दिनांक स्पष्ट नमूद केल्याखेरीज त्यांच्या पत्रव्यवहाराची वा शिष्टमंडळाची दखलही घेऊ नये असे या आदेशात म्हटले असून, त्यासाठी राज्यातील शासनमान्य एकूण २६० संघटनांची यादीही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)