शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

दो आदमी, करोडो मच्छरआठ हजार

By admin | Updated: December 25, 2014 23:29 IST

उत्पत्तीस्थाने : डासांची घनता मापनासाठी पालिकेकडे अपुरे कर्मचारी

नाशिक : ‘छे गोली और आदमी तीन... बहुत नाइन्साफी है ये...’ गाजलेला हिंदी चित्रपट ‘शोले’मधील गब्बरला हा प्रश्न पडला आणि त्याने त्याच्या पिस्तुलातील तीन गोळ्या खाली करून तो सोडविलादेखील. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र शहरातील डासांची घनता मोजण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याबाबत गब्बरइतके अजून यश आलेले नाही. सुमारे वीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि २५९.१३ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेल्या नाशिक शहरात पालिकेनेच सर्वेक्षण केलेली ७९४७ डासांची उत्पत्तीस्थाने आहेत; परंतु संपूर्ण शहरात डासांची घनता मोजण्यासाठी महापालिकेकडे अवघे दोन कर्मचारी अर्थात कीटक समाहरक आहेत. त्यामुळे ‘दो आदमी और करोडो मच्छर’ हा प्रश्न पालिकेने लवकर सोडविला नाही तर ‘यशवंत’ चित्रपटातील नाना पाटेकरने म्हटलेल्या ‘एक मच्छर आदमी को...’ या संवादाची आठवण कायम होत राहील. गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. आता थंडीमुळे डासांचा उपद्रव काहीसा कमी झाल्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. डेंग्यूची लागण इडिस डासामुळे होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने या डासांच्या अळ्या शोधण्यासाठी शहर पालथे घातले. त्यासाठी सारी यंत्रणा कामाला लावली. अळ्या नष्ट केल्या. धूर व औषध फवारणी केली. मात्र, याचदरम्यान पालिकेचे दोन कर्मचारी संपूर्ण शहरात डासांची घनता मोजण्याचे काम करत होते. कोणत्या भागात डासांची घनता किती आहे, त्यानुसार पालिकेचा आरोग्य विभाग धूर व औषध फवारणीचे नियोजन करत होता. त्यामुळे सदर दोन कर्मचाऱ्यांवरच खऱ्या अर्थाने शहराचे आरोग्य अवलंबून आहे, असे म्हटले तर वावगे ठरूनये. नाशिक महापालिका हद्दीत सहा विभाग आहेत. त्यातील प्रत्येकी तीन विभाग सदर दोन कर्मचाऱ्यांना वाटून देण्यात आले असून, हे कीटक समाहरक दररोज सकाळी आणि सायंकाळी आपापल्या विभागात फिरतात आणि ज्या ठिकाणी डासांचा जास्त उपद्रव असेल त्या भागात जाऊन एका परीक्षानळीत डास ओढून घेतात. त्याचे निरीक्षण करतात. एका भागात किती वेळ थांबल्यानंतर परीक्षानळीत किती डास गोळा होतात, यावरून त्याची घनता काढली जाते. पाच पेक्षा अधिक घनता आढळून आल्यास सदर भागाने डासांच्या बाबतीत धोकादायक पातळी ओलांडल्याचे निश्चित केले जाते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जाते. डासांची घनता मोजणारे अवघे दोन कर्मचारी असल्याने आणि त्यांच्याकडून सकाळी आणि सायंकाळी यावेळी विशिष्ट वेळेतच परीक्षण करावयाचे असल्याने त्यांची धावपळ उडताना दिसून येते. त्यात सदर कर्मचारी आपल्या कामाला कितपत न्याय देत असेल याबाबत शंकाच आहे. वास्तविक शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण लक्षात घेता तसेच डासांची सुमारे आठ हजार कायम उत्पत्तीस्थाने पाहता सहा विभागांत प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. महापालिकेने सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सोडवावा अन्यथा कागदोपत्री घनतामापन होत राहील आणि दिवसेंदिवस शहरातील आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर बनत जाईल. (प्रतिनिधी)