शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आदिवासींनी दिला प्रशासनाला दणका

By admin | Updated: September 12, 2015 00:08 IST

आठ तास ठिय्या : नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन

येवला : आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात व विविध मागण्यांसाठी येवल्यात मोर्चा काढण्यात आला. तब्बल आठ तास हे आंदोलन चालले. रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले.संघटनेच्या वतीने मोर्चाची पूर्वसूचना देऊनही प्रांताधिकारी वासंती माळी निवेदन स्वीकारण्यासाठी हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आठ तास प्रांताधिकारी कार्यालय आवारात २ हजार कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. तहसीलदार शरद मंडलिक यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने शुक्र वारी सायंकाळी ७ वाजता दोन हजार आदिवासी बांधव रस्त्यावर आले. त्यांनी रास्ता रोको सुरू केला. पोलीस उपाअधीक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलनकर्ते निर्णयावर ठाम राहिल्याने नगर-मनमाड रस्त्यावर ४ किमी अंतरावर रात्री उशिरापर्यत वाहतूक ठप्प होती.एकलव्य संघटनेच्या वतीने दणका मोर्चाचे शुक्रवारी आयोजन केले होते. शनिपटांगण येथून मोर्चाला सुरुवात झाली. प्रांताध्यक्ष शिवाजीराव ढवळे, संघटक प्रवीण गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आदिवासी बांधवांच्या जमिनी कायद्यात बदल करून बिगर आदिवासी व बिल्डरच्या घश्यात घालण्यासाठी महसूल यंत्रणेचा प्रयत्न आहे. बड्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव खेळाल तर राज्यभरात आदिवासी पेटून उठेल. तलाठी सर्कल आणि पोलीस पाटील यांनी आदिवासींच्या जागेवर जाऊन पंचनामा करून जातीचे दाखले द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रांत संघटक प्रवीण गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. खावटी कर्ज माफ करून पुन्हा कर्ज उपलब्ध व्हावे, शासकीय वसतिगृह व्हावे, आदिवासी आश्रम शाळेत अत्याचार झाला तर शासनाने त्या शाळेची मान्यता काढून घ्यावी, आदिवासींचा स्तर सुधारण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढव्यात अशा मागण्या जळगाव जिल्हा अध्यक्ष सुधाकर वाघ, उत्तर महाराष्ट्राचे संघटक बाळासाहेब गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी यावेळी भाषणातून केल्या. मोर्चात मोठाभाऊ दळवी, रतन सोनवणे, रामकृष्ण निकम, वैभव सोनवणे, भिका पवार, संतोष निकम, नितीन मोरे, किरण मोरे, राजेंद्र पिंपळे, बहिरम खंडू, मारु ती मोरे, विजय गायकवाड, विजय चौधरी, पुडलिक माळी, संजय नवरे, नामदेव पवार, सहभागी झाले होते.

 

आदिवासींमध्ये वठणीवर आणण्याची धमकआदिवासी आत्महत्त्या करीत नाहीत हा आदर्श घेण्यासारखा आहे. आंदोलन करून शासनाला ठिकाणावर आणण्याची धमक आदिवासी ठेवतो असे प्रतिपादन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी करताच टाळयांचा कडकडाट झाला. आदिवासींच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

जातीचे दाखले व वनहक्क जमातीचे दावे निकाली काढू, याबाबत लेखी आश्‍वासन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी फॅक्सद्वारे शुक्र वारी रात्नी साडेआठ वाजता नासिकहून येवल्याला पाठवले अन् रास्ता रोको आंदोलन थांबले. त्यानंतर तब्बल दोन तास बंद असलेली नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.राहुल खाडे यांनी पोलिसांची कुमक बोलावली होती.