शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अवकाळी पावसाची तत्काळ नुकसानभरपाई मिळावी

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

स्थायी समिती बैठक : ठराव संमत

  नाशिक : जिल्'ात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकराशे कोटींहून अधिक शेतपिकांचे नुकसान झालेले असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करून शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. रावसाहेब थोरात सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. त्यात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आदि उपस्थित होते. सभेत जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे कृषी विभागाची माहिती देत असताना, सदस्य गोरख बोडके यांनी जिल्'ातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विचारली. तसेच इगतपुरी तालुक्यासह जिल्'ातील सर्वच नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ भरपाई मिळावी, असा ठराव केला. प्रा. अनिल पाटील यांनी या ठरावात दुरुस्ती करताना शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व्हावे या मागण्यांचा ठरावात समावेश केला. बोराडे यांनी नाशिकसह इगतपुरी, चांदवड, कळवण, बागलाण, येवला या भागांत एकाच दिवसात ४६२ मिलिमीटर पाऊस पडल्याने द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती दिली. शैलेश सूर्यवंशी यांनी बागलाण तालुक्यात कांदा, द्राक्ष, डाळींब या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करून शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव संमत करून तो शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला.