शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

जळगाव नेऊरला रास्ता रोको

By admin | Updated: November 24, 2015 23:03 IST

संभाजी ब्रिगेड : पालखेड कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी

येवला : पालखेड कालव्याला आवर्तन देण्यात यावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी करण्यात यावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव नेऊर येथे संभाजी ब्रिगेडने मंगळवारी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या रास्ता रोकोची दखल घेत तहसीलदार शरद मंडलिक व तालुका पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे यांनी तत्काळ जळगाव नेऊर येथे धाव घेतली व निवेदन स्वीकारले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी पं. स. सभापती प्रकाश वाघ, युवा नेते कुणाल दराडे, शेतकरी नेते सुरेश कदम, बाबा थेटे यांची भाषणे झाली. शासनाने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने ठोस उपाययोजना राबवाव्या, असा भाषणाचा सूर होता.दोन वर्षांपासून येवला तालुका दुष्काळाची झळ सोसत आहे. तसेच या दोन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेती उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या. तहसीलदार शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवला आणि निफाड तालुक्यातील कांदा व द्राक्षपीक वाचविण्यासाठी पालखेड कालव्याला त्वरित पाणी सोडण्यात यावे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफी देण्यात यावी, कांद्याचे निर्यातमूल्य २१ डिसेंबर २०१६ पर्यंत कायमस्वरूपी शून्य करावे, मराठा आरक्षण आणि धनगर समाज आरक्षण त्वरित मंजूर करावे, शेतकऱ्यांचे व कष्टकरी लोकांचे केबीसी, इमूपालन, समृद्ध जीवन, भाईचंद हिराचंद रायसोनी या योजनांत अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न कराव व संचालकांना कडक शासन करावे, शेतकऱ्यांनी कर्जासाठी सहकारी बँकांमध्ये व पतसंस्थांमध्ये तारण ठेवलेल्या सोने दागिन्याचा जाहीरपणे होणारा लिलाव त्वरित थांबवावा, मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊचे नाव देण्यात यावे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न करता स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा आदि मागण्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनात करण्यात आल्या आहेत.आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुदाम पडवळ, उपाध्यक्ष रमेश कदम, वसंत शिंदे, विकास ठोंबरे, विजय भोजने, दीपक बोऱ्हाडे, रावसाहेब अहेर तसेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पं. सं. सभापती प्रकाश वाघ, कुणाल दराडे, सुरेश कदम, जयाजीनाना शिंदे, बाजीराव सोनवणे, तुकाराम शिंदे, भाऊसाहेब कदम, एकनाथ वाघ, संजय कदम, राजेंद्र बोराडे आदिंसह शेतकरी व शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)