शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

आरक्षणामुळे हिरमोड!

By admin | Updated: January 8, 2017 00:44 IST

भालूर गट : राजकीय वातावरण तापू लागले

 गिरीश जोशी मनमाडजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवारीबाबत राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे, तर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या मातब्बरांचा आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालूर गटामध्ये भालूर व पानेवाडी हे दोन गण येतात. यावेळी तालुक्यात जातेगाव या नवीन गटाची निर्मिती झाल्याने भालूर गटातील काही गावे कमी करण्यात आली आहे. भालूर गट हा अनुसूचित जाती महिला या उमेदवारासाठी राखीव असून, भालूर गण हा अनुसूचित जमाती व पानेवाडी गण हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव आहे. भालूर गटातून जामदरी व नवीन पांझण ही गावे कमी करून साकोरा गटाला जोडण्यात आली आहे, तर लक्ष्मीनगर, वडाळी खु, वडाळी बु।। ही गावे जातेगाव गटाला जोडण्यात आली आहेत.अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते; मात्र या सर्वांचाच आरक्षणामुळे भ्रमनिरास झालेला पहावयास मिळाला. भालूर गट हा अनुसूचित जाती महिंला गटासाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यामुळे सर्वच पक्षांनी महिलेची शोधाशोध सुरू केली आहे. या आरक्षणामुळे मातब्बर नेत्यांनी शांत राहणे पसंत केले आहे.अनेक वर्षांपासून भालूर गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीच्या वेळी तालुक्यात भुजबळ यांचे वर्चस्व असले तरी या गटात व गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्या वेळेस शिवसेनेचे अशोक जाधव व राष्ट्रवादीचे अनिल खुरसणे यांच्यामध्ये लढत होऊन जाधव विजयी झाले होते. गणामध्ये सेनेच्या भीमाताई पाटील व राष्ट्रवादीच्या निर्मला इनामदार यांच्यात लढत होऊन पाटील विजयी झाल्या होत्या. पानेवाडी गणात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुरक्षा केसकर यांनी तत्कालीन पं. स. सदस्य बाळासाहेब अव्हाड यांच्या सौभाग्यवती विमलबाई अव्हाड यांचा पराभव केला होता.आरक्षणामुळे यंदाच्या निवडणुकीत गटाची व गणाची स्थिती बदली आहे. विद्यामान सदस्य उमेदवारी करण्याच्या मनस्थिीतीत असले तरी त्यांना जागेची तडजोड करावी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विद्यमान जि. प. सदस्य अशोक जाधव हे भालूर गणातून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पं. स. सदस्य भीमाताई पाटील यांना नवीन गणाचा शोध घ्यावा लागणार आहे. पानेवाडी गणाच्या सदस्य सुरक्षा केसकर यांचा पानेवाडी गण सर्वसाधारण असल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. १९७९ साली कै. बाबूराव हाके यांच्यानंतर प्रथमच केसकर यांच्या रूपाने पंचायत समितीवर धनगर समाजाला सभापती व उपसभापतिपदाचा मान मिळाला आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन खलबते सुरू केली आहेत. आपल्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढण्यासाठीची पूर्ण तयारी झाली असली तरी सन्मानाची वागणूक मिळाल्यास समविचारी पक्षांशी युती करण्याची भाषा प्रत्येक पक्षाच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. सध्याच्या विद्यमान सदस्यांबरोबरच इतरही नवीन उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाबरोबर युती होईल वा आघाडी होईल, याबाबत परिसरात चर्चा झडत आहेत. याबाबतीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह अन्य पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. आपल्याला मानणारा कोण, पक्षाला मानणारा कोण याची आकडेमोड सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीवर भुजबळांचा प्रभाव दिसून आला असला तरी यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलला भाजपा स्थानिक पातळीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.