शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

नियोजनात रेल्वे धावली सुपरफास्ट

By admin | Updated: October 4, 2015 23:01 IST

दूरदृष्टी : उत्पन्नापेक्षा साधनसामग्रीवर लक्ष केंद्रित; परतीच्या भाविकांमुळे मिळाले उत्पन्न

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात उत्पन्नाची आर्थिक गणिते मांडण्यापेक्षा कायमस्वरूपी साधनसामग्री कशी निर्माण होईल, असेच नियोजन करणाऱ्या रेल्वेला नाशिकचा कुंभमेळा चांगलाच पावला. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर चौथा प्लॅटफॉर्म, ओव्हरब्रीज, नवीन तिकीट केंद्र, रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी आदि महत्त्वाची कामे झाल्याने मोठे इन्फ्रास्टक्चर उभे राहिले. रेल्वेला सिंहस्थाच्या माध्यमातून फारसे उत्पन्न अपेक्षित नसले तरी, रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कुंभ भरला गेला, असेच म्हणावे लागेल. सिंहस्थ कुंभमेळ्यातून किती उत्पन्न मिळेल आणि किती भाविक प्रवास करतील याचे गणित मांडण्यापेक्षा रेल्वेने इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवरच अधिक भर दिला. त्याचा फायदा नाशिकरोड रेल्वेस्थानकाला झाला असून, रेल्वेस्थानकाचे संपूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे. सिंहस्थाच्या काळात देशभरातून रेल्वेने सुमारे ७० ते ८० लाख भाविक प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तिकीट काढून किती भाविक प्रवास करतील याविषयी रेल्वे प्रशासन साशंक असल्याने आर्थिक गणित मांडले गेले नाही, असे रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही तीन महिन्यांच्या काळात सुमारे ४५० विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून अंदाजे २१ करोड इतके उत्पन्नही मिळाले. रेल्व खात्याने उत्पन्नाचे गणित आखण्यापेक्षा कायमस्वरूपी इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे राहील यावर लक्ष केंद्रित केल्याने रेल्वेचा खजिना भरला नसला तरी, इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिल्याने रेल्वे विभागाने त्यातच समाधान मानले आहे. कोणत्याही यात्रा विशेष गाड्यांचे नियोजन करताना रेल्वे मंत्रालयाकडून केवळ गाड्या पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. तेथे उत्पन्नाचा विषय नसतो. हाच विचार सिंहस्थ कुंभमेळ्यात करण्यात आला. त्यामुळे उत्पन्नापेक्षा भाविकांची सोय आणि साधनसामग्री यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याचा सकारात्मक परिणामही दिसून आला. देशभरातून भाविकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनासासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामगिरीवर होते. रेल्वेने वेळोवेळी ४५० गाड्या सोडल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या गाड्यांमधून रेल्वेला फारसे उत्पन्न मिळालेच नाही. या गाड्या कधी आल्या आणि कधी गेल्या याचा पत्ताच नाही. मात्र परतीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांचा उपयोग झाला. सुमारे ४० ते ५० लाख भाविक रेल्वेने रवाना झाले.