शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नियोजनात रेल्वे धावली सुपरफास्ट

By admin | Updated: October 4, 2015 23:01 IST

दूरदृष्टी : उत्पन्नापेक्षा साधनसामग्रीवर लक्ष केंद्रित; परतीच्या भाविकांमुळे मिळाले उत्पन्न

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात उत्पन्नाची आर्थिक गणिते मांडण्यापेक्षा कायमस्वरूपी साधनसामग्री कशी निर्माण होईल, असेच नियोजन करणाऱ्या रेल्वेला नाशिकचा कुंभमेळा चांगलाच पावला. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर चौथा प्लॅटफॉर्म, ओव्हरब्रीज, नवीन तिकीट केंद्र, रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी आदि महत्त्वाची कामे झाल्याने मोठे इन्फ्रास्टक्चर उभे राहिले. रेल्वेला सिंहस्थाच्या माध्यमातून फारसे उत्पन्न अपेक्षित नसले तरी, रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कुंभ भरला गेला, असेच म्हणावे लागेल. सिंहस्थ कुंभमेळ्यातून किती उत्पन्न मिळेल आणि किती भाविक प्रवास करतील याचे गणित मांडण्यापेक्षा रेल्वेने इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवरच अधिक भर दिला. त्याचा फायदा नाशिकरोड रेल्वेस्थानकाला झाला असून, रेल्वेस्थानकाचे संपूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे. सिंहस्थाच्या काळात देशभरातून रेल्वेने सुमारे ७० ते ८० लाख भाविक प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तिकीट काढून किती भाविक प्रवास करतील याविषयी रेल्वे प्रशासन साशंक असल्याने आर्थिक गणित मांडले गेले नाही, असे रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही तीन महिन्यांच्या काळात सुमारे ४५० विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून अंदाजे २१ करोड इतके उत्पन्नही मिळाले. रेल्व खात्याने उत्पन्नाचे गणित आखण्यापेक्षा कायमस्वरूपी इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे राहील यावर लक्ष केंद्रित केल्याने रेल्वेचा खजिना भरला नसला तरी, इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिल्याने रेल्वे विभागाने त्यातच समाधान मानले आहे. कोणत्याही यात्रा विशेष गाड्यांचे नियोजन करताना रेल्वे मंत्रालयाकडून केवळ गाड्या पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. तेथे उत्पन्नाचा विषय नसतो. हाच विचार सिंहस्थ कुंभमेळ्यात करण्यात आला. त्यामुळे उत्पन्नापेक्षा भाविकांची सोय आणि साधनसामग्री यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याचा सकारात्मक परिणामही दिसून आला. देशभरातून भाविकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनासासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामगिरीवर होते. रेल्वेने वेळोवेळी ४५० गाड्या सोडल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या गाड्यांमधून रेल्वेला फारसे उत्पन्न मिळालेच नाही. या गाड्या कधी आल्या आणि कधी गेल्या याचा पत्ताच नाही. मात्र परतीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांचा उपयोग झाला. सुमारे ४० ते ५० लाख भाविक रेल्वेने रवाना झाले.