शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

आरक्षण फेरबदलाने धक्का

By admin | Updated: November 17, 2016 22:11 IST

उपनगर, आगरटाकळी परिसर : मूलभूत सुविधांची ओरड कायम

 पंकज पाटील नाशिकगेल्या २५ वर्षांच्या काळात आगरटाकळी, उपनगर परिसरातील जनतेने राजकीयदृष्ट्या कधीही एकाच पक्षाला कौल दिलेला नाही. या भागात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, मनसे यांच्या जोडीला अपक्ष उमेदवारांनाही प्रभागाचा कारभार चालविण्याची संधी दिली आहे. एकूणच या भागात कुठलाही राजकीय पक्ष कायम सत्ताधारी राहिलेला नाही. हा परिसर नेहमीच व्यक्तिकेंद्रित राहिला आहे. त्यामुळेच अपक्षांनीही या भागात अनेकवेळा संधी मिळाली आहे. मात्र नव्या प्रभाग रचनेत पूर्वीचा प्रभाग ३१ व ३७ मिळून नव्याने झालेला प्रभाग १६ हा भौगोलिकदृष्ट्या बराच मोठा झाल्याने तसेच स्लम वस्त्यांचाही परिसर मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाल्याने इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्याने झालेल्या प्रभागातून इच्छामणी मंदिर व नवीन चाळ परिसर वगळण्यात आल्याने विद्यमान नगरसेवकांच्या व्होट बॅँकेला धक्का पोहोचला आहे. नव्याने झालेल्या प्रभाग १६ मध्ये चार जागांपैकी अनुसूचित जाती व जमाती- साठीच्या दोन जागांवर महिलांना संधी मिळणार असून, उर्वरित एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर एक सर्वसाधारण गटासाठी असल्यामुळे ओबीसी व खुल्या गटातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. आरक्षणाच्या फेरबदलामुळे आजी-माजी नगरसेवक हे एकमेकांसमोर उभे ठाकणार असून, सद्यस्थितीतील विद्यमान नगरसेवकांना प्रभागाची मोठी व्याप्ती तसेच मातब्बर इच्छुकांचे तगडे आव्हानदेखील राहणार आहे. नवीन प्रभागाचा परिसर हा व्यक्तिकेंद्रित मतदान करत असल्याने या ठिकाणी पॅनल टु पॅनल मतदान होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांचा चांगलाच कस लागणार आहे. तसेच नागरिकांची मूलभूत सुविधांबाबतची ओरड कायम आहे. अनेक कॉलनी रस्त्यांंची कामे रखडलेली असल्याने आगामी काळात प्रभागातील विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा ंमोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. प्रभागरचना बदलल्याने यंदा राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या लढतींमध्ये चुरस दिसून येऊ शकते. नवीन प्रभागरचनेत एस.टी. प्रवर्गासाठी प्रथमच आरक्षण पडल्याने आजी-माजी नगरसेवकांचे गणित बिघडले असून, यंदा सर्वच राजकीय पक्षांना, मातब्बर उमेदवारांना संधी देण्याबरोबरच मजबूत पॅनलची बांधणी करताना भौगोलिकदृष्ट्या समतोल सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आगरटाकळी, उपनगर व गांधीनगर परिसर मिळून नव्याने प्रभाग १६ तयार झाला असून, पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत १९९२ मध्ये अपक्ष नगरसेवक अशोक दिवे, विजय ओहोळ व कॉँग्रेसच्या वंदना मनचंदा, १९९७ मध्ये पुन्हा अपक्ष नगरसेवक अशोक दिवे व विजय ओहोळ यांच्या पत्नी सुमन ओहोळ व कॉँग्रेसच्या वंदना मनचंदा यांना कौल दिला होता. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये अपक्ष नगरसेवक अशोक दिवे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. २००२ च्या त्रिसदस्यीय प्रभागरचनेत मतदारांनी सेना-भाजप युतीचे अनिल ताजनपुरे व उज्ज्वला हिरे व राष्ट्रवादीने जयंत जाधव यांच्या रूपाने या भागात प्रथमत:च खाते उघडले होते. २००७ द्विसदस्यीय प्रभाग रचनेत मनसेकडून विजय ओहोळ, तर कॉँग्रेसचे रमेश जाधव हे अवघ्या एका मताने विजयी झाले होते. तर कॉँग्रेसकडून माया दिवे व राष्ट्रवादीकडून प्रशांत मोरे यांनादेखील संधी मिळाली होती. २०१२च्या द्विसदस्यीय रचनेत राज ठाकरेंच्या करिष्म्यामुळे मनसेच्या सुमन ओहोळ व मेघा साळवे यांना संधी मिळाली. तर भाजपाकडून प्रा. कुणाल वाघ व कॉँग्रेसकडून राहुल दिवे निवडून आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे हे नुकतेच भाजपवासी झाले आहेत.