शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दाभाडीच्या गडावर हिरे घराण्याचीच सत्ता

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

राज्यभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि सतत मंत्रिपद भुषविणाऱ्या दाभाडी विधानसभा मतदारसंघावर १९७८ ते २००४ पर्यंत हिरे घराण्याचीच सत्ता होती;

राज्यभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि सतत मंत्रिपद भुषविणाऱ्या दाभाडी विधानसभा मतदारसंघावर १९७८ ते २००४ पर्यंत हिरे घराण्याचीच सत्ता होती; फरक इतकाच की हिरे घराण्याशी राजकीय स्पर्धा करताना इतरांना निकराची झुंज द्यावी लागली असली तरी १९८५ पर्यंत डॉ. बळीराम हिरे व व्यंकटराव हिरे अशा दोन घरातच सत्तेसाठी राजकारण फिरत राहिले. त्यांना शिवसेनेचे अशोक हिरे यांनी मात्र तुल्यबळ लढत दिली होती.मालेगाव तालुक्याचे ऐंशीच्या दशकात दोन विधानसभा क्षेत्र होती. मालेगाव व दाभाडी या नावाने परिचित. मालेगाव मुस्लिम बहुल वस्तीचे तर दाभाडी म्हणजे उर्वरित तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग होय. १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला पराभव पचवावा लागला. त्यानंतर जनता पक्षाचे सरकार आले. त्यावेळेस मोरारजी देसाई पंतप्रधानपदावर आरुढ झाले होते. त्यांचे सरकार २५ महिने टिकले; त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम झाला.१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत दाभाडी मतदारसंघात राजकारण तापले होते. भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे डॉ. बळीराम हिरे इच्छुक होते; परंतु त्र्यंबक रामजी पवार (टी. आर. पवार) हे शरद पवार यांच्या निकटचे मानले जायचे. त्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे तिकीट मिळाले. ऐनवेळी डॉ. बळीराम हिरे यांना कॉँग्रेस (आय)च्या तिकिटावर लढावे लागले. तर माकपाने राजाराम निकम यांना मैदानात उतरविले होते. या निवडणूकीत चार उमेदवार रिंगणात होते. इंदिरा कॉँग्रेसचे डॉ. बळीराम हिरे ३२ हजार ९१८ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजाराम दामोदर निकम यांना १ हजार ७९५, भाराकॉँचे टी. आर. पवार यांना ८ हजार ८८ तर जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी नामदेव पाटील यांना २५ हजार ३६ मते मिळाली होती.दाभाडीत भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या अधिपत्याखाली राजकारण सुरू असल्याने कॉँग्रेसचा दबदबा होता. १९७८ च्या निवडणुकीत प्रचारासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या. डॉ. हिरे विजयी झाल्यानंतर त्यांना शिक्षणमंत्रीपदाची लॉटरी लागली होती. तालुक्याचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. त्यावेळी डॉ. हिरे यांची मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर दोनच वर्षात पुन्हा झालेल्या निवडणुकीत पुन्हा हिरेंनी बाजी मारली आणि मतदारसंघावर साम्राज्य निर्माण केले. १९८० च्या निवडणूकीत दोन हिरे सत्ता संपादनासाठी समोरासमोर आले होते. यात डॉ. बळीराम हिरे कॉँग्रेस (आय) तर व्यंकटराव हिरे कॉँग्रेस (अर्स) तर्फे उमेदवारी करीत होते. आपआपसामधील नातेसंबंधामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात दोघा उमेदवारांचे असंख्य नातेवाईक दाभाडीमध्येच असताना आणि विशेष म्हणजे दोघांची सासरवाडी देखील दाभाडी असल्याने याचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. कोणाला मतदार कौल देतील याचा अंदाज बांधणे त्यावेळी अवघड होते. डॉ. हिरे यांना ३८ हजार ९०६ मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार व्यंकटराव हिरे यांना ३० हजार ७८५ मते मिळाली. व्यंकटराव हिरे यांना ८ हजार १२१ मतांनी पराभव सहन करावा लागला. नव्वदच्या दशकात कॉँग्रेसची राजकीय स्थिती अंतर्गत बंडाळीमुळे चांगली नव्हती. दाभाडी मतदारसंघात १९८५ च्या विधानसभा निवडणुकाही हिरे घराण्यातील जावाजावांमध्ये झालेल्या लढतींमुळे गाजल्या. या रणधुमाळीत तब्बल दहा उमेदवारांनी रंगत आणली होती. यात कॉँग्रेस आय, भाराकॉँ यांच्याबरोबरच भारतीय रिपब्लिकन पक्षाने मैदानात उडी घेतली होती. या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह सात अपक्ष उमेदवारांनी आपले राजकीय नशिब आजमावले. येथे हिरे घराण्यातील महिलांनी प्रथमच उमेदवारी केली. यात व्यंकटराव हिरे यांच्या पत्नी पुष्पाताई हिरे यांना भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स) तर्फे तर कॉँग्रेस (आय) तर्फे इंदिराताई बळीराम हिरे यांना उमेदवारी मिळाली. देवराज गरुड यांनी भारिपतर्फे उमेदवारी केली. हिरे घराण्यातील दोघाही महिला उमेदवारांमध्ये निवडणूक पुन्हा अटीतटीची झाली. कॉँग्रेस आयतर्फे प्रचारासाठी केंद्रातील नेते के. सी. पंत, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, अंबिका सोनी आले होते. कॉँग्रेस (अर्स)च्या प्रचाराची धुरा शरद पवार यांनी सांभाळली होती. भारिपचे उमेदवार देवराज गरूड यांच्या प्रचारासाठी रा. सु. गवई यांनी प्रचारात रंगत आणली होती. त्यांनी प्रचारात भूमीहिनांना जमिनी, राखीव जागा आरक्षण, महागाई, गरिबी हटाव आदि मुद्दे वापरले होते. या निवडणुकीत पुष्पाताई हिरे यांनी मागील निवडणुकीत पती व्यंकटराव हिरे यांच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढला. भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स)च्या उमेदवार असलेल्या पुष्पाताई हिरे यांनी ३९ हजार ८७६ मते घेऊन प्रतिस्पर्धी कॉँग्रेस (आय)च्या उमेदवार इंदिराताई हिरे यांचा ३ हजार २२८ मतांनी पराभव केला होता. इंदिराताई हिरे यांना ३६ हजार ६४४ मते मिळाली होती. निवडणुकीत प्रथमच भारीपतर्फे उमेदवारी करणारे देवराज गरुड यांना अवघ्या १६०० मतांवर समाधान मानावे लागले.१९८५ मध्ये शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही दलाला नाशिक जिल्ह्याने भरभरून साथ दिली. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघातून पुलोदचे उमेदवार निवडून आले होते. याचे बक्षीस म्हणूनच पुष्पाताई हिरे यांना शरद पवार यांनी मंत्रिमडळात समावेश करून त्यांचा सन्मान केला. त्यांना परिवहन व उर्जा राज्यमंत्री मंत्रिपद देण्यात आले होते. मालेगाव तालुक्यातील दाभाडी विधानसभा क्षेत्रामध्ये कॉँग्रेसची सत्ता अबाधित राहिली. मग ते कॉँग्रेस (अर्स) अथवा भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस असो. महाराष्ट्राच्या राजकारणात दाभाडीचा सत्तेत राहण्याचा वरचष्मा राहिला आहे. नाशिक जिल्ह्यातून दाभाडीचा विजयी उमेदवार मंत्रीपद भुषवत होता. हिरेंच्या गाव पातळीच्या राजकारणात इतर नवीन चेहऱ्यांना वाव नव्हता तर समाजवादी, जातीयवादी पक्षांचा दाभाडीच्या राजकारणात शिरकाव झालेला नव्हता. त्यामुळे कॉँग्रेस विजयी होते व हिरेंच्या नेतृत्वाने राजकारण व समाजकारण चालते अशी बोचरी टिका जाणकार मंडळीकडून केली जात होती. व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे यांच्या रुपाने तालुक्याला १९७८ ते १९८५ च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री यासारखी महत्वाची पदे मिळाली आहेत. त्यामुळे दाभाडी मतदारसंघ नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे.