शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

राजकीय पक्षांकडून स्थानिक प्रश्नांना बगल

By admin | Updated: February 18, 2017 00:30 IST

निवडणूक : नोटाबंदी, शेतमालाचे भाव याभोवती फिरतोय प्रचार

नाशिक : महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही विरोधकांकडून नोटाबंदी, शेतमालाचे भाव, अडत या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. या मुद्द्यांमुळे सत्ताधारी भाजपाची अडचण होत असली तरी नोटाबंदीचे समर्थक करण्याबरोबरच अच्छे दिनचे स्वप्न दाखविले जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाशी निगडित मुद्द्यांमुळे स्थानिक रस्ते, वीज, पाणी योजना या स्थानिक प्रश्नांना मात्र सर्वच पक्षांकडून बगल दिली जात आहे. ‘एकच ध्यास भागाचा विकास’ अशी प्रचारपत्रके मतदारांच्या हाती दिली जात असली तरी त्यात विकासाचा कुठलाही अजेंडा दिसत नसल्याने सर्वसामान्य मतदारही संभ्रमित झाले आहेत.  जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गावोगावी प्रचारसभा, चौक सभांचे फड रंगू लागले आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांबरोबरच जिल्हास्तरीय आणि स्टार प्रचारकांच्या सभांना वेग येऊ लागला आहे. विरोधकांच्या प्रचारसभांमध्ये नोटाबंदी आणि शेतमालाच्या पडलेल्या भावावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे. नोटाबंदीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात असताना संबंधित गट व गणांतील स्थानिक मुद्द्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी सिंचन, अपूर्ण नळपाणीपुरवठा योजना, वीज, रस्ते, पाझर तलाव आदि समस्या कायम आहेत. या समस्या आपण कशा सोडविणार, याविषयी कुणीही बोलण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भागाचा विकास म्हणजे नेमका कोणता आणि कसा याचा कोणताही अजेंडा उमेदवारांकडे दिसून येत नाही.  कसमादे भागातील बागलाण तालुक्यात हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र. ८ हे प्रकल्प प्रलंबित आहेत, तर देवळा तालुक्यातील पूर्व भागातील काही भागात झाडी-एरंडगाव कालव्याचा प्रश्न काहीअंशी चर्चेत आहे. मागील वर्षी कळवण तालुक्यात चणकापूर आणि पूनंद धरणांमध्ये पाणी असूनही ते स्थानिकांना दिले नसल्याच्या मुद्द्याला स्पर्श केला जात असला तरी येथे नोटाबंदी, कांदा भाव, भाजीपाला, अडत या मुद्द्यांवर अधिक भर दिला जात आहे.  आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये माकपाने वन जमिनींचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा केला असला तर नळपाणीपुरवठा योजना, बारगळलेल्या किंवा अपूर्ण  योजनांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुरगाणा भागात सिंचन, स्थलांतर हे मुद्दे चर्चिले जात  असले तरी त्याला म्हणावी तितकी धार नाही.  जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची दिशा पाहिली तर केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषयांवर विरोधकांकडून टीका आणि सत्ताधाऱ्यांकडून अच्छे दिनचे समर्थन या भोवती फिरत असून, पाणी योजना, रस्ते, वीज या मूलभूत समस्या बाजूला पडल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)