शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांकडून स्थानिक प्रश्नांना बगल

By admin | Updated: February 18, 2017 00:30 IST

निवडणूक : नोटाबंदी, शेतमालाचे भाव याभोवती फिरतोय प्रचार

नाशिक : महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही विरोधकांकडून नोटाबंदी, शेतमालाचे भाव, अडत या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. या मुद्द्यांमुळे सत्ताधारी भाजपाची अडचण होत असली तरी नोटाबंदीचे समर्थक करण्याबरोबरच अच्छे दिनचे स्वप्न दाखविले जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाशी निगडित मुद्द्यांमुळे स्थानिक रस्ते, वीज, पाणी योजना या स्थानिक प्रश्नांना मात्र सर्वच पक्षांकडून बगल दिली जात आहे. ‘एकच ध्यास भागाचा विकास’ अशी प्रचारपत्रके मतदारांच्या हाती दिली जात असली तरी त्यात विकासाचा कुठलाही अजेंडा दिसत नसल्याने सर्वसामान्य मतदारही संभ्रमित झाले आहेत.  जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गावोगावी प्रचारसभा, चौक सभांचे फड रंगू लागले आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांबरोबरच जिल्हास्तरीय आणि स्टार प्रचारकांच्या सभांना वेग येऊ लागला आहे. विरोधकांच्या प्रचारसभांमध्ये नोटाबंदी आणि शेतमालाच्या पडलेल्या भावावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे. नोटाबंदीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात असताना संबंधित गट व गणांतील स्थानिक मुद्द्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी सिंचन, अपूर्ण नळपाणीपुरवठा योजना, वीज, रस्ते, पाझर तलाव आदि समस्या कायम आहेत. या समस्या आपण कशा सोडविणार, याविषयी कुणीही बोलण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भागाचा विकास म्हणजे नेमका कोणता आणि कसा याचा कोणताही अजेंडा उमेदवारांकडे दिसून येत नाही.  कसमादे भागातील बागलाण तालुक्यात हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र. ८ हे प्रकल्प प्रलंबित आहेत, तर देवळा तालुक्यातील पूर्व भागातील काही भागात झाडी-एरंडगाव कालव्याचा प्रश्न काहीअंशी चर्चेत आहे. मागील वर्षी कळवण तालुक्यात चणकापूर आणि पूनंद धरणांमध्ये पाणी असूनही ते स्थानिकांना दिले नसल्याच्या मुद्द्याला स्पर्श केला जात असला तरी येथे नोटाबंदी, कांदा भाव, भाजीपाला, अडत या मुद्द्यांवर अधिक भर दिला जात आहे.  आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये माकपाने वन जमिनींचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा केला असला तर नळपाणीपुरवठा योजना, बारगळलेल्या किंवा अपूर्ण  योजनांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुरगाणा भागात सिंचन, स्थलांतर हे मुद्दे चर्चिले जात  असले तरी त्याला म्हणावी तितकी धार नाही.  जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची दिशा पाहिली तर केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषयांवर विरोधकांकडून टीका आणि सत्ताधाऱ्यांकडून अच्छे दिनचे समर्थन या भोवती फिरत असून, पाणी योजना, रस्ते, वीज या मूलभूत समस्या बाजूला पडल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)