शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

साहित्यातून घडते जीवनाचे दर्शन

By admin | Updated: October 4, 2015 23:47 IST

मिथिलाप्रसाद त्रिपाठी : हिंदी साहित्य पर्वणीतील परिसंवादात प्रतिपादन

नाशिक : जीवन आणि साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, वाचकांमुळे साहित्याला परिपूर्णता येते. वास्तव जीवनाचे दर्शन घडवणारेच खरे साहित्य असते, असे प्रतिपादन इंदूरच्या कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. मिथिलाप्रसाद त्रिपाठी यांनी केले. साहित्य सरिता हिंदी मंच व अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी साहित्य पर्वणी या कार्यक्रमात ‘साहित्य और जीवन’ विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शंकराचार्य संकुलात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सी. पी. मिश्र होते. यावेळी डॉ. त्रिपाठी म्हणाले, माणसाला आलेले अनुभव दुसऱ्याच्या हितासाठी लिखित स्वरूपात व्यक्त करणे म्हणजे साहित्य होय. या साहित्याला वाचक, श्रोत्यांमुळे पूर्णत्व येते. ते नसतील तर साहित्याला अर्थच उरत नाही. भारतात साहित्याला प्राचीन परंपरा आहे. वेदांमध्ये काव्य दिसून येते. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हे साहित्यच आहे. जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्वे सांगणारे लिखाण साहित्यच असते. साहित्यातून कर्म, कृती करण्याची प्रेरणा मिळते. ते स्थिर मनाला चल बनवते. बीएसएनएलचे महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती यांनी सांगितले की, आपण तांत्रिक क्षेत्रात असल्याने त्यातच लिखाण केले व तेच आपल्यासाठी साहित्य आहे. उत्तम साहित्य जीवनाला प्रभावित करते, तर संदर्भहीन साहित्य दिशाहीन बनवते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने साहित्याचा प्रसार होतो आहे. कोणी काय घ्यायचे, हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे. चलार्थपत्र मुद्रणालयाचे महाप्रबंधक संदीप जैन यांनीही परिसंवादात सहभाग घेतला. ते म्हणाले, माणसाच्या चिंतनातून, सर्जनशीलतेतून साहित्य निर्माण होते. मनाच्या डोळ्यांनी पाहणाऱ्या हृदयापासून जे लिखाण करतात, त्यांचे साहित्य लोकोपयोगी असते. मन आणि हृदयाचा संबंध नसेल तर ते साहित्य वाचकांना भावत नाही. उदयपूर विश्वविद्यालयाच्या प्रा. डॉ. करुणा दशोडा यांनी सांगितले की, कल्पनाशक्ती असल्यास साहित्याची निर्मिती सोपी जाते; मात्र या निर्मितीचा सत्याशी संबंध असल्यास ती वाचकांना अधिक खोलवर भिडते. यतीशचंद्र मिश्र यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर साहित्य सरिताचा वार्षिक अंक ‘सृजन सरोवर’ व ‘अर्पण’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी साहित्य सरिता मंचाच्या अध्यक्ष डॉ. ज्योती गजभिये होत्या. वाराणसी येथील शंकराचार्य परमहंस परिव्राजकाचार्य ज्ञानानंद सरस्वती, प्रख्यात लेखिका डॉ. संतोष श्रीवास्तव, डॉ. राजम नटराजन पिल्लै, ‘सृजन सरोवर’च्या संपादक डॉ. रोचना भारती, ‘अर्पण’च्या संपादक सुनीता माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सुबोधकुमार मिश्र यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चंद्रशेखर नागपुरे, शारदा गायकवाड, स्वप्नील कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)