शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

केवळ उद्दिष्टपूर्तीचा अट्टहास

By admin | Updated: January 9, 2017 01:34 IST

अशास्त्रीय वृक्षारोपण : दहा फुटांच्या हजारो रोपांच्या लागवडीचा पालिकेने मांडला ‘देखावा’

अझहर शेख ल्ल नाशिकदहा फुटांचे २१ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने निवडलेल्या कंपन्यांकडून आटापिटा केला जात आहे. शहरात जरी युद्धपातळीवर वृक्षारोपण केले जात असल्याचे दृश्य नाशिककरांच्या नजरेस पडत असले तरी हे दृश्य चिरकाल ‘हरित’ दिसणारे असेल का? याबाबत साशंकता आहे. कारण उद्दिष्टपूर्तीसाठी वृक्षारोपणाच्या शास्त्रीय पद्धतीला संबंधितांकडून छेद दिला जात आहे.महापालिकेकडून शहरात २१ हजार रोपांच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला गेला असून, त्यापैकी ११ हजार रोपे अवघ्या आठवडाभरातच लावून ठेकेदारांनी डोक्यावरचा भार खांद्यावर आणून ठेवला आहे; मात्र हा भार कमी करताना ज्या हेतुसाठी वृक्षारोपण केले जात आहे, किमान तो हेतू साध्य होणार का? याचा विचार संबंधितांनी केला नाही. शहराचे पर्यावरण टिकून रहावे आणि हरित नाशिक, स्वच्छ प्रदूषण मुक्त नाशिक’ निर्माण व्हावे, यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वृक्षारोपणासाठी कोट्यवधींचा खर्च उचलला आहे; मात्र ज्या पद्धतीने शहरात विविध भागांमध्ये अद्याप रोपांची लागवड करण्यात आली आहे ती पद्धत अत्यंत ‘क्रूर’ अशीच म्हणावी लागेल असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. जागेची अयोग्य निवड, रोपांभोवतालच्या प्लास्टिकच्या पिशव्यांसह लागवड, उच्च दाबाच्या वीजतारांखाली लागवड, रोपाच्या आकारापेक्षा दुप्पट आकाराचा ‘जेसीबी’ने केले जाणारे खड्डे, रिंगरोडच्या कडेला थेट पाथवेलाच खेटून खोदलेले खड्डे, रोपांभोवती आळे नाही, अशा थातूरमातूर व पूर्णत: चुकीच्या पद्धतीने क रण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे २१ हजारांपैकी किती रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होईल, हा आगामी काळात संशोधनाचा विषय ठरणार आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदारांना योग्य समज देऊन शास्त्रीयदृष्ट्या वृक्ष लागवडीची अट बंधनकारक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.