शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कांदा उत्पादक संकटात

By admin | Updated: November 2, 2015 23:34 IST

येवला : शेतकरी संघटनेतर्फे निवेदन

येवला : राज्यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु दुष्काळी परिस्थिती व पाणी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून निर्यात पूर्णत: खुली करावी, अशी विनंती येवला बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे तसेच संचालक तथा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पा. झांबरे यांनी एका निवेदनाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करूनही अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झाली व कांद्याचे बाजारभाव जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये प्रमाणापेक्षा वाढले. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन १५० डॉलरवरून ७५० डॉलर केल्याने निर्यात पूर्णपणे बंद झाली. तसेच बाहेरील देशातून कांदा आयात केल्याने कांद्याचे बाजारभाव स्थिर राहिले.त्याकरिता बाहेरील देशातून करण्यात येणारी कांद्याची आयात बंद करून आपल्या देशातील कांदा बाहेरील देशात निर्यात करण्यासाठी कांद्याचे मूल्य पूर्णत: हटवून जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा. कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्यास त्याचा फायदा पाकिस्तानसह इतर देशांतील शेतकऱ्यांना होईल. कांद्याचे निर्यातमूल्य पूर्णत: हटविल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्यास योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, दोन पैसे त्यांच्या हातात पडतील व ग्राहकांनाही कांदा वाजवी दरात उपलब्ध होईल. यासाठी केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त केली आहे. कारण सदरचा निर्णय शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून खुली करावी. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.