शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कांदा उत्पादक संकटात

By admin | Updated: November 2, 2015 23:34 IST

येवला : शेतकरी संघटनेतर्फे निवेदन

येवला : राज्यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु दुष्काळी परिस्थिती व पाणी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून निर्यात पूर्णत: खुली करावी, अशी विनंती येवला बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे तसेच संचालक तथा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पा. झांबरे यांनी एका निवेदनाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करूनही अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झाली व कांद्याचे बाजारभाव जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये प्रमाणापेक्षा वाढले. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन १५० डॉलरवरून ७५० डॉलर केल्याने निर्यात पूर्णपणे बंद झाली. तसेच बाहेरील देशातून कांदा आयात केल्याने कांद्याचे बाजारभाव स्थिर राहिले.त्याकरिता बाहेरील देशातून करण्यात येणारी कांद्याची आयात बंद करून आपल्या देशातील कांदा बाहेरील देशात निर्यात करण्यासाठी कांद्याचे मूल्य पूर्णत: हटवून जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा. कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्यास त्याचा फायदा पाकिस्तानसह इतर देशांतील शेतकऱ्यांना होईल. कांद्याचे निर्यातमूल्य पूर्णत: हटविल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्यास योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, दोन पैसे त्यांच्या हातात पडतील व ग्राहकांनाही कांदा वाजवी दरात उपलब्ध होईल. यासाठी केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त केली आहे. कारण सदरचा निर्णय शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून खुली करावी. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.