शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक संकटात

By admin | Updated: November 2, 2015 23:34 IST

येवला : शेतकरी संघटनेतर्फे निवेदन

येवला : राज्यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु दुष्काळी परिस्थिती व पाणी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून निर्यात पूर्णत: खुली करावी, अशी विनंती येवला बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे तसेच संचालक तथा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पा. झांबरे यांनी एका निवेदनाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करूनही अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झाली व कांद्याचे बाजारभाव जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये प्रमाणापेक्षा वाढले. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन १५० डॉलरवरून ७५० डॉलर केल्याने निर्यात पूर्णपणे बंद झाली. तसेच बाहेरील देशातून कांदा आयात केल्याने कांद्याचे बाजारभाव स्थिर राहिले.त्याकरिता बाहेरील देशातून करण्यात येणारी कांद्याची आयात बंद करून आपल्या देशातील कांदा बाहेरील देशात निर्यात करण्यासाठी कांद्याचे मूल्य पूर्णत: हटवून जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा. कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्यास त्याचा फायदा पाकिस्तानसह इतर देशांतील शेतकऱ्यांना होईल. कांद्याचे निर्यातमूल्य पूर्णत: हटविल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्यास योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, दोन पैसे त्यांच्या हातात पडतील व ग्राहकांनाही कांदा वाजवी दरात उपलब्ध होईल. यासाठी केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त केली आहे. कारण सदरचा निर्णय शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून खुली करावी. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.