शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आता कानात बुरशी, बॅक्टेरियाचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : पावसाळ्यात ज्या व्यक्तींना अधिक काळ पावसात भिजत काम करावे लागते किंवा कोणत्याही कारणास्तव प्रदीर्घ काळ पाण्यात राहावे ...

नाशिक : पावसाळ्यात ज्या व्यक्तींना अधिक काळ पावसात भिजत काम करावे लागते किंवा कोणत्याही कारणास्तव प्रदीर्घ काळ पाण्यात राहावे लागते, अशा व्यक्तींना पावसाळ्यात किंवा त्यानंतरच्या काळात संबंधितांना कानात बुरशी किंवा बॅक्टेरियाचा धोका दिसून येतो.

सध्या विविध आजारांसह कानदुखीच्या तक्रारी अनेक घरांमध्ये दिसून येत आहेत. पावसात दीर्घकाळ भिजणाऱ्यांना कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढत असून नेहमीच्या सवयीप्रमाणे कानात औषध टाकणे अथवा ती बुरशी काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या रुग्णांना त्यापासून अधिक धोका असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात हौसेने भिजणे होत असले तरी त्यानंतर छत्री, रेनकोट यांचा आधार घेतला जातो. अचानक हवेत आलेल्या गारव्यामुळे सर्दी होते, तर वाढलेल्या सर्दीमुळे तापाची साथ पसरते, साचलेल्या पाण्यामुळे डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो आणि मलेरियासारख्या आजारांची लागण होते. मात्र पावसात भिजल्यामुळे कानदुखी होण्याची अनेक उदाहरणे यंदा दिसून येत आहेत. मात्र अद्यापही कानदुखीसारख्या रोगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत. कानातील ओलावा अथवा साठणारे पाणी अशी स्थिती बुरशीच्या वाढीस पोषक असते. त्यावर योग्य उपचार न झाल्यास कानाच्या वेदना असह्य होतात. बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या वाऱ्या करत आहेत. त्यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण अधिक असून पावसात काम, प्रवास करणाऱ्या रुग्णांनाही त्याचा धोका अधिक आहे.

-------------------

ओटिटिस म्हणजेच कानाला होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे कान सतत दुखत राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नका. कानाच्या दुखण्यावर वेळीच निदान व उपचार झाल्यास कान लवकर बरा होऊ शकतो.

तसेच ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कानाच्या क्षमतेवर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे, अधिकाधिक काळ पाण्यात राहणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत.

कान लाल होणे, श्रवणशक्ती कमी होणे, कानाच्या आतील त्वचा खराब होणे, कान दुखणे, जळजळ व सूज येणे, कानाच्या त्वचेला रॅश येणे आणि कानात तयार झालेला मळ बाहेर न पडणे ही कानाला बुरशी संसर्ग झाल्याची लक्षणे आहेत. बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. बुरशी होणे हा गंभीर रोग नसला तरी त्याकडे वेळीच लक्ष देऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. अन्यथा घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

-----------------

कानाचे नियमित निरीक्षण करणे, आंघोळ करताना रोज करंगळीने कान स्वच्छ करणे, तसेच कोणत्याही प्रकारची कानदुखी, संसर्ग किंवा कानापाशी रॅश येत असल्यास कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वत: कोणताही निर्णय घेऊन घरगुती उपाय करून कानाचे नुकसान करू नये. संबंधितावर आवश्यकतेनुसार डॉक्टर उपचार करतील.

----------------

ही डमी आहे.