शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

यंदा पाणीकपात नाही !

By admin | Updated: October 28, 2016 23:25 IST

मुबलक साठा : जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय

नाशिक : बरोबर वर्षभरापूर्वी मराठवाड्यातील जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद पेटलेला होता. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू केली होती. १ ते ५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाचा भडका उडाला, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे आंदोलकांची कोंडी झाली. त्यानंतर जुलै २०१६ अखेरपर्यंत नाशिककरांनी पाणीकपातीचा सामना केला. यंदा, मात्र गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के पाणीसाठा असल्याने आणि मराठवाड्यात वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने नाशिककरांना मागीलवर्षाप्रमाणे पाणीकपातीला सामोर जावे लागणार नाही. सन २०१५ मध्ये सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घोषित केला व त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली होती. महापालिकेने पाणीबचतीसंदर्भात नियोजन करताना मनपाचे जलतरण तलावही बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापालिकेकडून पाणीकपात सुरू झालेली असतानाच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि तेथूनच पाणीप्रश्न अधिकच पेटला. शेतकऱ्यांची आंदोलने, धरणावर ठिय्या, आमदारांच्या घरासमोर घंटानाद अशी आंदोलने झालीत. पाणी आरक्षणाची बैठकही लांबवण्यात आली. अशा साऱ्या वातावरणात जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करत गंगापूरमधून २७००, तर दारणातून ३०० दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. त्यामुळे पाणीकपात वाढविण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय उरला नाही. पुढे जुलै २०१६ अखेरपर्यंत महापालिकेने आठवड्यातून दोन वेळा पाणीकपात करत पुरून-पुरून पाणी वापरले. (प्रतिनिधी)गंगापूर धरणात ९३ टक्के पाणीसाठाशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ आॅक्टोबर अखेर ५२३३ दलघफू म्हणजे ९३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७० टक्के होता, तर समूहातील कश्यपी धरणात यंदा ९९ टक्के, गौतमी गोदावरीत ९३ टक्के, आळंदी धरणात १०० टक्के आणि दारणा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट नाही. महापालिकेने यावर्षी गंगापूर धरणातून ४२००, तर दारणातून १०० दलघफू पाणी आरक्षण मागितले होते, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत गंगापूर धरणातील ३९०० तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेमार्फत शहरात रोज ४१० दसलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीकपातीचे संकट झेलणाऱ्या नाशिककरांवर मात्र यंदा वरुणराजा मेहरबान झाला आणि आॅगस्टमधील पावसानेच धरणे भरली गेली. परतीच्या वेळी पावसाने मराठवाड्यावरही कृपावृष्टी केल्याने जायकवाडीसह बहुतांश धरणे ८० टक्क्यांवर भरली. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी २८ आॅक्टोबरअखेर अवघा ६ टक्के इतका होता. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदा गंगापूरमधून पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याने पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.