शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

यंदा पाणीकपात नाही !

By admin | Updated: October 28, 2016 23:25 IST

मुबलक साठा : जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय

नाशिक : बरोबर वर्षभरापूर्वी मराठवाड्यातील जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद पेटलेला होता. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू केली होती. १ ते ५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाचा भडका उडाला, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे आंदोलकांची कोंडी झाली. त्यानंतर जुलै २०१६ अखेरपर्यंत नाशिककरांनी पाणीकपातीचा सामना केला. यंदा, मात्र गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के पाणीसाठा असल्याने आणि मराठवाड्यात वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने नाशिककरांना मागीलवर्षाप्रमाणे पाणीकपातीला सामोर जावे लागणार नाही. सन २०१५ मध्ये सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घोषित केला व त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली होती. महापालिकेने पाणीबचतीसंदर्भात नियोजन करताना मनपाचे जलतरण तलावही बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापालिकेकडून पाणीकपात सुरू झालेली असतानाच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि तेथूनच पाणीप्रश्न अधिकच पेटला. शेतकऱ्यांची आंदोलने, धरणावर ठिय्या, आमदारांच्या घरासमोर घंटानाद अशी आंदोलने झालीत. पाणी आरक्षणाची बैठकही लांबवण्यात आली. अशा साऱ्या वातावरणात जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करत गंगापूरमधून २७००, तर दारणातून ३०० दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. त्यामुळे पाणीकपात वाढविण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय उरला नाही. पुढे जुलै २०१६ अखेरपर्यंत महापालिकेने आठवड्यातून दोन वेळा पाणीकपात करत पुरून-पुरून पाणी वापरले. (प्रतिनिधी)गंगापूर धरणात ९३ टक्के पाणीसाठाशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ आॅक्टोबर अखेर ५२३३ दलघफू म्हणजे ९३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७० टक्के होता, तर समूहातील कश्यपी धरणात यंदा ९९ टक्के, गौतमी गोदावरीत ९३ टक्के, आळंदी धरणात १०० टक्के आणि दारणा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट नाही. महापालिकेने यावर्षी गंगापूर धरणातून ४२००, तर दारणातून १०० दलघफू पाणी आरक्षण मागितले होते, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत गंगापूर धरणातील ३९०० तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेमार्फत शहरात रोज ४१० दसलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीकपातीचे संकट झेलणाऱ्या नाशिककरांवर मात्र यंदा वरुणराजा मेहरबान झाला आणि आॅगस्टमधील पावसानेच धरणे भरली गेली. परतीच्या वेळी पावसाने मराठवाड्यावरही कृपावृष्टी केल्याने जायकवाडीसह बहुतांश धरणे ८० टक्क्यांवर भरली. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी २८ आॅक्टोबरअखेर अवघा ६ टक्के इतका होता. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदा गंगापूरमधून पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याने पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.