शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पाणीकपात नाही !

By admin | Updated: October 28, 2016 23:25 IST

मुबलक साठा : जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय

नाशिक : बरोबर वर्षभरापूर्वी मराठवाड्यातील जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद पेटलेला होता. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू केली होती. १ ते ५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाचा भडका उडाला, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे आंदोलकांची कोंडी झाली. त्यानंतर जुलै २०१६ अखेरपर्यंत नाशिककरांनी पाणीकपातीचा सामना केला. यंदा, मात्र गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के पाणीसाठा असल्याने आणि मराठवाड्यात वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने नाशिककरांना मागीलवर्षाप्रमाणे पाणीकपातीला सामोर जावे लागणार नाही. सन २०१५ मध्ये सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घोषित केला व त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली होती. महापालिकेने पाणीबचतीसंदर्भात नियोजन करताना मनपाचे जलतरण तलावही बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापालिकेकडून पाणीकपात सुरू झालेली असतानाच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि तेथूनच पाणीप्रश्न अधिकच पेटला. शेतकऱ्यांची आंदोलने, धरणावर ठिय्या, आमदारांच्या घरासमोर घंटानाद अशी आंदोलने झालीत. पाणी आरक्षणाची बैठकही लांबवण्यात आली. अशा साऱ्या वातावरणात जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करत गंगापूरमधून २७००, तर दारणातून ३०० दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. त्यामुळे पाणीकपात वाढविण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय उरला नाही. पुढे जुलै २०१६ अखेरपर्यंत महापालिकेने आठवड्यातून दोन वेळा पाणीकपात करत पुरून-पुरून पाणी वापरले. (प्रतिनिधी)गंगापूर धरणात ९३ टक्के पाणीसाठाशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ आॅक्टोबर अखेर ५२३३ दलघफू म्हणजे ९३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७० टक्के होता, तर समूहातील कश्यपी धरणात यंदा ९९ टक्के, गौतमी गोदावरीत ९३ टक्के, आळंदी धरणात १०० टक्के आणि दारणा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट नाही. महापालिकेने यावर्षी गंगापूर धरणातून ४२००, तर दारणातून १०० दलघफू पाणी आरक्षण मागितले होते, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत गंगापूर धरणातील ३९०० तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेमार्फत शहरात रोज ४१० दसलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीकपातीचे संकट झेलणाऱ्या नाशिककरांवर मात्र यंदा वरुणराजा मेहरबान झाला आणि आॅगस्टमधील पावसानेच धरणे भरली गेली. परतीच्या वेळी पावसाने मराठवाड्यावरही कृपावृष्टी केल्याने जायकवाडीसह बहुतांश धरणे ८० टक्क्यांवर भरली. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी २८ आॅक्टोबरअखेर अवघा ६ टक्के इतका होता. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदा गंगापूरमधून पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याने पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.