शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

चाळीत टिकणारे कांद्याचे नवीन वाण

By admin | Updated: January 11, 2017 22:43 IST

चितेगाव : राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्रात झाले संशोधन; कमी कालावधीत जास्त उत्पादन

निफाड : चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान प्रतिष्ठानने वाढीव उत्पादन, साठवण क्षमता असलेले कांद्याचे लाल ४ - (एल -७४४) हे नवीन वाण विकसित केले. या नवीन कांद्याच्या वाणाबाबत या संशोधन केंद्राचे सहायक संचालक डॉ आर. के. सिंग यांनी माहिती देताना सांगितले की, या नवीन वाणाचे खरीप, उशिरा खरीप, रब्बी या तीनही हंगामात घेतले जाते. हे पीक महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कांदा पीक तिन्ही हंगामात घेतले जाणार आहे. भारत, मुख्य कांदा उत्पादक देश असून, निर्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात १.१९ दशलक्ष हेक्टर पासून १९,३५ दशलक्ष टन कांदा उत्पादित होतो. नाशवंत पीक असल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून जास्त उत्पादन क्षमता आणि जास्त काळ साठवून ठेवता येईल अशा नवीन वाणाची निर्मिती चितेगाव येथील विकास प्रतिष्ठानने केली आहे.या नवीन वाणाची पात सरळ उभी हिरावीगडद दिसेल. कांद्याचा रंग गडद लाल, गोलाकृती गोल आकार, पातळ मान आणि ५.५ -६.५० सें.मी. कांद्याचा व्यास आहे. २० कांद्याचे सरासरी वजन १.५०-१.७० किलो असेल. कापणी झाल्यानंतर कांदा फार मजबूत असेल. कांद्याच्या लागणीनंतर ११५-१२० दिवसात हे पीक तयार होईल. विशेष म्हणजे कांद्यावर येणारा जांभळा अंगावरील डाग सारख्या रोगाला प्रतिकारक असे हे रोप आह.े एका एकराला या वाणाचे ७ ते८ किलो बियाणे लागेल. एकरी१६० क्विंटलच्या आसपास त्याचे उत्पादन मिळेल. हे नवीन वाण पुढील खरीप उत्तरार्धात व रब्बी हंगामासाठी साधारण जुलै,आॅगस्ट मिहन्यात उपलब्ध करून दिले जाईल चितेगाव, लासलगाव, सिन्नर या अधिकृत केंद्रांशिवाय अधिकृत डीलरांकडे हे बियाणे उपलब्ध असेल असे सिंग यांनी सांगितले. (वार्ताहर)