शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

By admin | Updated: January 11, 2017 22:47 IST

सातत्याने घसरण : नाशिककर गारठले; पारा ५.८ अंशावर

नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून सर्वाधिक आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककर गारठले आहेत. बुधवारी (दि. ११) सकाळी किमान तपमानाचा पारा ५.८ अंशावर स्थिरावला.  जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आला आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तपमानात घसरण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. मंगळवारी ६.५ अंशावर शहराचे किमान तपमान होते. बुधवारी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत हवेमध्ये गारठा जाणवत होता, त्यामुळे नोकरदार व श्रमिक नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करणे पसंत केले होते. अहमदनगरचे किमान तपमान ७.१, मालेगाव ७.४, पुणे ७.७, सातारा १०.०, सांगली ११.५, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, महाबळेश्वर १२.० असा प्रमुख शहरांचा पारा पुण्याच्या वेधशाळेने नोंदविला.नाशिकचा इतिहास बघता दरवर्षी जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा राहिला आहे. २०१५ साली २५ डिसेंबरला हंगामातील ५.४ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच २०१६ मध्ये २२ जानेवारीला ५.५ नीचांकी तपमान नोंदविले गेले होते.आठवडाभरापासून सातत्याने नाशिकच्या थंडीमध्ये वाढ होत असून, नाशिककर गारठले आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. निफाडला सध्या पारा ५ अंशापर्यंत घसरला आहे. यामुळे शेतीकामांवरही परिणाम झाला असून, गहू पिकासाठी थंडी पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक मात्र धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)