शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

By admin | Updated: January 11, 2017 22:47 IST

सातत्याने घसरण : नाशिककर गारठले; पारा ५.८ अंशावर

नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून सर्वाधिक आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककर गारठले आहेत. बुधवारी (दि. ११) सकाळी किमान तपमानाचा पारा ५.८ अंशावर स्थिरावला.  जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आला आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तपमानात घसरण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. मंगळवारी ६.५ अंशावर शहराचे किमान तपमान होते. बुधवारी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत हवेमध्ये गारठा जाणवत होता, त्यामुळे नोकरदार व श्रमिक नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करणे पसंत केले होते. अहमदनगरचे किमान तपमान ७.१, मालेगाव ७.४, पुणे ७.७, सातारा १०.०, सांगली ११.५, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, महाबळेश्वर १२.० असा प्रमुख शहरांचा पारा पुण्याच्या वेधशाळेने नोंदविला.नाशिकचा इतिहास बघता दरवर्षी जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा राहिला आहे. २०१५ साली २५ डिसेंबरला हंगामातील ५.४ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच २०१६ मध्ये २२ जानेवारीला ५.५ नीचांकी तपमान नोंदविले गेले होते.आठवडाभरापासून सातत्याने नाशिकच्या थंडीमध्ये वाढ होत असून, नाशिककर गारठले आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. निफाडला सध्या पारा ५ अंशापर्यंत घसरला आहे. यामुळे शेतीकामांवरही परिणाम झाला असून, गहू पिकासाठी थंडी पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक मात्र धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)