शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी! विठाई जननी भेटे केव्हा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

सायखेडा (बाजीराव कमानकर) : पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !! न लगे त्या ...

सायखेडा (बाजीराव कमानकर) : पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !! न लगे त्या विना सुखाचा सोहळा ! लागे मज ज्वाळा अग्निचिया ! तुका म्हणे त्याचे पाहिलीया पाया ! मग दुःख जाय सर्व माझे !!

वारकरी सांप्रदाय आणि तमाम भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्ताने शेकडो वर्ष सुरु असलेली वारीची ओढ लागली आहे. आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक महिना मजल दर मजल करत हा वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन विठूरायाला भेटायला जातात.

मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने वारी बंद करून प्रातिनिधिक स्वरूपात वारी काढून आषाढी साजरी केली होती. यंदा देखील कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे, रुग्ण संख्या मंदावली असली तरी कोरोना आजार गेला असं म्हणता येणार नाही त्यामुळे शासन स्तरावर वारी संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

शेकडो वर्षांची परंपरा खंडित करून भाविकांचा अंत न पाहता वारीत जाणाऱ्या प्रत्येक भाविकांची कोरोना चाचणी करुन त्यांना लस देऊन यंदा वारीचा सोहळा व्हावा अशी मागणी वारकरी संप्रदायाचे प्रदेश अध्यक्ष नितीन सातपुते यांनी केली आहे. वारकऱ्यांची संख्या आणि ज्या गावातून हा सोहळा जाणार आहे, त्या गावच्या दोन किलोमीटर अंतरावर मुक्काम ठेऊन इतर गावांना त्रास होणार नाही याची काळजी घेत मर्यादित स्वरूपात का होईना पण हा सोहळा झाला पाहिजे असे मत ह. भ. प. कृष्णा महाराज कमानकर यांनी व्यक्त केले.

वारीची तयारी करण्यासाठी भाविकांना काही दिवस वेळ हवा असतो. त्यामुळे शासन काय निर्णय घेते, मागील वर्षीप्रमाणे यंदा सोहळा रद्द होणार की निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

------------------------

सुरक्षा वारी असावी, भाविकांची अपेक्षा

१)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत खंड पडू नये म्हणून वारी व्हावी मात्र, ही वारी मात्र सुरक्षा वारी असावी असे मत भाविकांकडून व्यक्त होत आहे.

२)संत निवृत्ती महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथून सत्तावीस दिवस अगोदर होत असते, मात्र सद्य परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून राज्यात लॉकडाऊन सुरु असून संचारबंदी कायम आहे तर सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

३) गतवर्षी शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच संतांच्या पालखीचा सोहळा रद्द केला होता. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या जबाबदारीवर प्रमुख निवडक संतांच्या पादुका वीस वारकऱ्यांसमवेत बसने पंढरीला विठूरायाच्या चरणी नेण्यात आल्या होत्या. वास्तविक शासनाने दिलेल्या नियमानुसार लाखो भाविकांनी आषाढी घरीच साजरी केली होती.